शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Corona Virus: रायगडच्या पर्यटनाला कोरोनाचा फटका; परदेशी पर्यटकांना नो एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 23:30 IST

हॉटेल, रिसॉर्टमधील बुकिंग रद्द

अलिबाग : सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. शनिवारपासून लागोपाठ होळीची सुट्टी असल्याने अनेकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे बेत आखले. मात्र, कोरोनाच्या धसक्याने जिल्ह्यात येणाºया पर्यटकांना हे बेत रद्द करावे लागले आहेत. रिसॉर्ट, हॉटेल, लॉजिंगमध्ये केलेले बुकिंग रद्द केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फटका जिल्ह्यातील हजारो हॉटेल, रिसॉर्ट आणि समुद्रकिनाºयावरील व्यावसायिकांना बसला आहे.

परदेशी नागरिकांना जिल्ह्यात नो एन्ट्री असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. दरवर्षी होळीच्या निमित्त गजबजणारे समुद्रकिनारे यंदा सामसुम दिसत आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, वरसोली, काशिद, दिवेआगार, हरिहरेश्वर, श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे धूलिवंदन आणि होळी सणाच्या निमित्ताने गर्दीने फुलून जातात. हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये तर जागाही मिळत नाही. मुंबई, पुणे, ठाणे या भागातून अनेक कुटुंबे चार दिवस येणाºया सुट्टीची संधी साधून आपल्या बच्चेकंपनीसह पर्यटनासाठी जाणार होते. मात्र, या वेळेला कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी प्लॅन रद्द केले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि प्रशासनाने गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहनही केले आहे.कोरोना विषाणू संसर्गजन्य रोग असल्याने जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून नागरिकही सतर्कता बाळगत असल्याने यंदा होळीनिमित्त आणि सुट्टीमुळे जिल्ह्यात येणाºया पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे.रायगडमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे परदेशी पर्यटक अलिबाग, काशीद येथील उच्चभ्रू रिसॉर्टमध्ये राहतात. मात्र, जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून परदेशी पर्यटकांना जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला आहे. बोटीने येणाºया पर्यटकांच्या तपासणीसाठी मांडवा जेट्टी येथेदेखील विशेष पथक आरोग्य विभागाकडून नेमले जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाtourismपर्यटन