शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

Corona Vaccination: चिंताजनक! राज्यात ९० लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी चुकवला दुसरा डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 05:35 IST

Corona Vaccination in Maharashtra: राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण ४१ टक्के आहे. तर पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. कोरोनाचे नवे म्युटेशन ओमायक्रॉनमुळे जगात दहशत निर्माण झाली असताना राज्यात अजूनही ९० लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतलेला नसल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

मुंबई : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण ४१ टक्के आहे. तर पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. कोरोनाचे नवे म्युटेशन ओमायक्रॉनमुळे जगात दहशत निर्माण झाली असताना राज्यात अजूनही ९० लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतलेला नसल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

राज्यात दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण ७ लाख ६० हजार ९५५, ऑक्टोबर महिन्यात ५ लाख २५ हजार १२१ वर तर नोव्हेंबर महिन्यात ४ लाख ६३ हजार ३८९ वर आले आहे. राज्यात लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि लसीचा डोस चुकलेल्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सुमारे ७० हजार आशा सेविका कार्यरत आहेत. राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, लसीच्या पहिल्या डोसमुळे नक्कीच संरक्षण मिळते; मात्र दुसरा डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळे आजार गंभीर स्थितीला जात नाही. शिवाय, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यताही अत्यल्प असते.

राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले की, राज्यातील लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. दिवाळीनंतर लसीकरणाकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानेही काही लाभार्थी दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, मात्र ही धोक्याची घंटा ठरू शकते. सध्या म्युटेशनमुळे नव्याने धडकलेल्या ओमायक्रॉनचा धोका असताना लसीकरण हाच प्रभावी मार्ग आहे.

 आदिवासीबहुल जिल्ह्यांत लसीकरण कमी

पालघर, नंदुरबार, गडचिरोली आणि अमरावती या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची संख्या कमी आहे. राज्यातील ३६ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. अकोला, नंदुरबार, बीड आणि अमरावतीत पहिल्या डोससह केवळ ५५ टक्के पात्र लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. काही समुदायांमध्ये लसीबाबत संकोच आहे. यासाठी पुढाकार घेत कार्यक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अप्पर प्रमुख सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस