शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा लेणीतील पर्यटनाला कोरोनाचा फास; ५०० कुटुंबांच्या रोजीरोटीवर गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 02:00 IST

पाच महिन्यांपासून उत्पन्न ठप्प; पर्यायी रोजगार नाही, आता प्रतीक्षा पर्यटकांची

उदयकुमार जैन 

औरंगाबाद : कोरोनामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील जवळपास ५०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. लेणीत येणारा पर्यटकच येथील व्यावसायिकांसाठी ‘अतिथी देवो भव’ असला तरी कोरोनाने त्याची वाट रोखल्याने लेण्याचे अर्थकारण शून्यावर आले आहे.

१७ मार्चपासून लेणी बंद आहे. सध्या पाऊस चांगला झाल्याने लेणीवर निसर्गसौंदर्याची उधळण होत असली तरी सन्नाटा बघायला मिळत आहे. १५ आॅगस्टनंतर येथील ‘पीक सीझन’ सुरू होतो आणि तो फेब्रुवारीपर्यंत चालतो. वर्षभरात सरासरी ४ लाखांवर देशी-विदेशी पर्यटक येथे येतात व यातून पाच कोटींची आर्थिक उलाढाल होते; परंतु ती ठप्प झाली आहे. याचा फास मात्र स्थानिक कामगार, मजूर, नोकर, व्यावसायिकांना बसला आहे. लेणीच्या टी-पॉइंटवर पर्यटकांना खरेदीसाठी एमटीडीसीने ७८ दुकाने बांधलेले आहेत. शिवाय पार्किंग, लेणी दर्शन तिकीट, डझनभर प्रदूषणमुक्त बस, उपाहारगृहे, लॉज, हॉलीडे रिसॉर्ट, रिक्षाचालक, सफाई कामगार, ४० डोलीवाले, १०० फेरीवाले, १० गाईड, पोस्ट कार्ड व गाईड बुक विक्रेते, भेळपुरीचालक, रंगीबेरंगी दगड विक्रेते, छोटे-मोठे हॉटेल्स असा येथील एकंदरीत दैनंदिन धांडोळा. यातून परिसरातील फर्दापूर, अजिंठा गाव, सावरखेडा, लेणापूर, ठाणा, वरखेडी, पिंपळदरी येथील जवळपास ५०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो; परंतु १७ मार्चपासून या सर्वांची आमदनी बंद झाल्याने आता लेणी पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.

आर्थिक संकटाचे सलग तिसरे वर्षगेली दोन वर्षे रस्त्याची समस्या त्यात यंदा कोरोनाने भर टाकली. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही लेणींचे अर्थचक्र थांबल्याने एमटीडीसीने दुकानदारांचे दोन वर्षांचे भाडे, वीज बिल माफ करावे, बँकेने बिनव्याजी कर्ज द्यावे, शासनाने आर्थिक पॅकेज द्यावे, प्रकल्पधारकांना ९९ वर्षांच्या करारावर शेती कसायला द्यावी, रोजगारनिर्मिती करावी. -पपिंद्रपालसिंग वाय.टी. (माजी अध्यक्ष, अजिंठा लेणी दुकानदार संघटना व एटीडीएफ सदस्य)एमटीडीसीलाही लाखोंचा फटकालेणीतील आमचे उपाहारगृह, पर्यटक निवास व इतर सुविधा केंद्र बंद असल्याने लाखोंचा फटका बसला आहे; परंतु कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलेले नाही. त्यांच्या माध्यमातून सर्व वास्तू मेन्टेन ठेवल्या जात आहेत. पर्यटक येताच त्यांची गैरसोय होणार नाही. -अखिलेश शुक्ला, प्रादेशिक महाव्यवस्थापक, एमटीडीसी, औरंगाबाद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटनAjantha - Elloraअजंठा वेरूळ