शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यसेवा पूर्व परिक्षेवर कोरोनाचे सावट; पुण्यात थांबाव की, गावी जावं या द्विधेत विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 15:58 IST

आता परिक्षेला 20 दिवस शिल्लक आहेत. मात्र गर्दीच्या कारणाने परिक्षा पुढे ढकली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

मुंबई - कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. आगामी काळात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधता म्हणून महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. मात्र 5 एप्रिल रोजी होऊ घातलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार की नाही यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 17 कोरोना व्हायरस बधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक पुण्यात आहेत. तर नागपूर, ठाणे आणि मुंबई येथेही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असून इतर सर्वाजनिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. 

पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा स्थितीत राज्यसेवा पूर्वपरिक्षा होणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. स्पर्धा परिक्षेची करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुण्यात सर्वाधिक आहे. तसेच बाहेरगावची मुलं देखील परिक्षा केंद्र म्हणून पुण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे 5 एप्रिल रोजी पुण्यात परिक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होणार आहे. अर्थात या कालावधीत कोरोना अधिक पसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

दरम्यान परिक्षेला 20 दिवस शिल्लक आहेत. मात्र गर्दीच्या कारणाने परिक्षा पुढे ढकली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मात्र हे निश्चित नाही. अशा स्थितीत गावी जावं की, पुण्यात थांबून परिक्षेची तयारी करावी असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे परिक्षा होणार की नाही, याविषयी आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. 

अनेक अभ्यसिका आधीच बंद

पुण्यात सदाशिव पेठ, नारायण पेठ परिसरात अनेक अभ्यासिका आहेत. मात्र कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर अनेक अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत. तर रुमवर अभ्यास होणे कठिण आहे. त्यातच परिक्षा होणार की नाही, हे निश्चित नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले आहेत.