शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

राज्यसेवा पूर्व परिक्षेवर कोरोनाचे सावट; पुण्यात थांबाव की, गावी जावं या द्विधेत विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 15:58 IST

आता परिक्षेला 20 दिवस शिल्लक आहेत. मात्र गर्दीच्या कारणाने परिक्षा पुढे ढकली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

मुंबई - कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. आगामी काळात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधता म्हणून महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. मात्र 5 एप्रिल रोजी होऊ घातलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार की नाही यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 17 कोरोना व्हायरस बधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक पुण्यात आहेत. तर नागपूर, ठाणे आणि मुंबई येथेही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असून इतर सर्वाजनिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. 

पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा स्थितीत राज्यसेवा पूर्वपरिक्षा होणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. स्पर्धा परिक्षेची करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुण्यात सर्वाधिक आहे. तसेच बाहेरगावची मुलं देखील परिक्षा केंद्र म्हणून पुण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे 5 एप्रिल रोजी पुण्यात परिक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होणार आहे. अर्थात या कालावधीत कोरोना अधिक पसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

दरम्यान परिक्षेला 20 दिवस शिल्लक आहेत. मात्र गर्दीच्या कारणाने परिक्षा पुढे ढकली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मात्र हे निश्चित नाही. अशा स्थितीत गावी जावं की, पुण्यात थांबून परिक्षेची तयारी करावी असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे परिक्षा होणार की नाही, याविषयी आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. 

अनेक अभ्यसिका आधीच बंद

पुण्यात सदाशिव पेठ, नारायण पेठ परिसरात अनेक अभ्यासिका आहेत. मात्र कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर अनेक अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत. तर रुमवर अभ्यास होणे कठिण आहे. त्यातच परिक्षा होणार की नाही, हे निश्चित नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले आहेत.