शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा ९ जिल्ह्यांमध्ये पुन्हा फैलाव, आराेग्य विभागाचा त्रिसूत्री कृती कार्यक्रम, खबरदारीच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:41 IST

CoronaVirus News In Maharashtra : टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अमरावती, अकोला, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुंबई : अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू झाल्यानंतर होत असलेल्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तर संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरही राज्यातील नऊ जिल्ह्यांत अधिक असणाऱ्या पॉझिटिव्हीटी दराचे प्रमाण कमी कऱण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यांत विशेष लक्ष देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.याविषयी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्समधील तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अमरावती, अकोला, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. हा दर कमी करण्यासाठी त्रिसूत्री कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत सहवासितांचा शोध, निदान व चाचणी या माध्यमातून काम कऱण्यात येत आहे. तसेच, कोरोनाविषयक उपचारांबाबत जनजागृती, प्रशिक्षण व समुपदेशनाद्वारे या प्रक्रिया हाताळण्यात येत आहेत.नागपूर, सातारा आणि नाशिक येथे अजूनही दैनंदिन रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत बेफिकीर राहू नये. त्याकरिता या वर्षअखेरपर्यंत मास्कचा वापर बंधनकारक आहे. सामान्यांनीही नियंत्रणात सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

राज्यात उद्यापासून देणार लसीचा दुसरा डोस- देशातील दिल्ली, गुजरात, तामिळनाडूसह विविध राज्यांमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस देण्याच्या टप्प्याला शनिवारपासून प्रारंभ झाला. मात्र महाराष्ट्रामध्ये सोमवार, १५ फेब्रुवारीपासून या टप्प्याला सुरूवात होणार आहे.-  १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला देशभरात प्रारंभ झाला. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी शनिवारी या लसीचा दुसरा डोस देण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशभरात ७९६७६४७ लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस