शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोरोनाचा ९ जिल्ह्यांमध्ये पुन्हा फैलाव, आराेग्य विभागाचा त्रिसूत्री कृती कार्यक्रम, खबरदारीच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:41 IST

CoronaVirus News In Maharashtra : टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अमरावती, अकोला, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुंबई : अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू झाल्यानंतर होत असलेल्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तर संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरही राज्यातील नऊ जिल्ह्यांत अधिक असणाऱ्या पॉझिटिव्हीटी दराचे प्रमाण कमी कऱण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यांत विशेष लक्ष देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.याविषयी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्समधील तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अमरावती, अकोला, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. हा दर कमी करण्यासाठी त्रिसूत्री कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत सहवासितांचा शोध, निदान व चाचणी या माध्यमातून काम कऱण्यात येत आहे. तसेच, कोरोनाविषयक उपचारांबाबत जनजागृती, प्रशिक्षण व समुपदेशनाद्वारे या प्रक्रिया हाताळण्यात येत आहेत.नागपूर, सातारा आणि नाशिक येथे अजूनही दैनंदिन रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत बेफिकीर राहू नये. त्याकरिता या वर्षअखेरपर्यंत मास्कचा वापर बंधनकारक आहे. सामान्यांनीही नियंत्रणात सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

राज्यात उद्यापासून देणार लसीचा दुसरा डोस- देशातील दिल्ली, गुजरात, तामिळनाडूसह विविध राज्यांमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस देण्याच्या टप्प्याला शनिवारपासून प्रारंभ झाला. मात्र महाराष्ट्रामध्ये सोमवार, १५ फेब्रुवारीपासून या टप्प्याला सुरूवात होणार आहे.-  १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला देशभरात प्रारंभ झाला. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी शनिवारी या लसीचा दुसरा डोस देण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशभरात ७९६७६४७ लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस