शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

“माझी लेकरं पाणी पिऊन झोपली अशी वेळ कोरोनानं आणली”; सिंधुताई सपकाळ भावूक झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 20:25 IST

सव्वा वर्ष झालं मी घरात बसून आहे. दिवस विवंचनेत जायचा तर रात्रं टेन्शनमध्ये जात होती

ठळक मुद्देकोरोना कधीतरी संपणारच आहे. उद्याचा दिवस उगवणार आहे. फक्त वाट पाहणं आपल्या हातात आहे. आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. घेतलेला वसा टाकू नका. दुकानाची शटर बंद झाली पण पोटाची भूक बंद झाली नाही.

मुंबई - कोरोनानं भाकरी हिरावून घेतली काम थांबली. कोरोनात अशी वेळ आली की माझी लेकरं पाणी पिऊन झोपली. भाकरीची भूक पाण्यावर का भागत नाही असं प्रश्न लेकरं विचारत होती. त्या प्रश्नांना उत्तर देता आलं नाही. मात्र अनेकांनी या काळात थोडी फार होईना मदत केली असं सांगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. बोधमार्ग फाऊंडेशनच्या ऑनलाईन ‘बोधवारी’(Bodhwari) या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता.

यावेळी सिंधुताई सपकाळ(Sindhutai Sakpal) म्हणाल्या की, कोरोनानं फार दु:खं दिलं. त्यावर फुंकर घाला, बोध घेता घेता जगणं शिका. दुकानाची शटर बंद झाली पण पोटाची भूक बंद झाली नाही. कोरोना काळात तग धरा, ढासळू नका.वारीच्या निमित्ताने माणसांना कुठेतरी समाधान, आत्मिक सुख, मानसिक शांती मिळते. त्यामुळे एकमेकांची काळजी घ्या. सोबत चला. कोरोनानं ह्दय तोडली त्याला गाठ आपण मारू, कुणीही कुणाचं नसतं. कोरोनानं आत्मीयता कशी असते? जिव्हाळा कसा असतो? भूक काय असते? देण्याघेण्याची प्रवृत्ती कशी असते? हे शिकवलं असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत सव्वा वर्ष झालं मी घरात बसून आहे. दिवस विवंचनेत जायचा तर रात्रं टेन्शनमध्ये जात होती. लेकरं अपेक्षेने पाहत असतात. हे दिवसही निघून जातील. कोरोना कधीतरी संपणारच आहे. उद्याचा दिवस उगवणार आहे. फक्त वाट पाहणं आपल्या हातात आहे. सर्वांनी सर्वांची काळजी घ्या, एक घास वाटून खाऊ. मागे वळून पहा, किती अंतर आपण चालत आलोय. आपलं आयुष्य वाटून टाकण्यात धन्य मानतो. आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. घेतलेला वसा टाकू नका. कोलमडू नका पुन्हा नव्याने उभं राहू असा विश्वास सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘बोधवारी’च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचता येत आहे. सध्या लोक देवाला मानत नाही. देवा सगळ्याचं भलं कर पण सुरूवात माझ्यापासून कर अशी लोकांची भावना झाली आहे. वारी करणारी माणसं खूप मोठी नसतात ती सर्वसामान्य गरीब असतात. ते वारी करत करत देवाचं नाव घेत चालत असतात. संपूर्ण देशात ही वारी पोहचवली जात आहे हे खूप मोठं काम आहे. ‘बोधवारी’च्या माध्यमातून घराघरात पोहचता येते. विभूश्रीचं हे काम यापुढेही असेच राहो असं सिंधुताईंनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpur Wariपंढरपूर वारी