शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

“माझी लेकरं पाणी पिऊन झोपली अशी वेळ कोरोनानं आणली”; सिंधुताई सपकाळ भावूक झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 20:25 IST

सव्वा वर्ष झालं मी घरात बसून आहे. दिवस विवंचनेत जायचा तर रात्रं टेन्शनमध्ये जात होती

ठळक मुद्देकोरोना कधीतरी संपणारच आहे. उद्याचा दिवस उगवणार आहे. फक्त वाट पाहणं आपल्या हातात आहे. आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. घेतलेला वसा टाकू नका. दुकानाची शटर बंद झाली पण पोटाची भूक बंद झाली नाही.

मुंबई - कोरोनानं भाकरी हिरावून घेतली काम थांबली. कोरोनात अशी वेळ आली की माझी लेकरं पाणी पिऊन झोपली. भाकरीची भूक पाण्यावर का भागत नाही असं प्रश्न लेकरं विचारत होती. त्या प्रश्नांना उत्तर देता आलं नाही. मात्र अनेकांनी या काळात थोडी फार होईना मदत केली असं सांगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. बोधमार्ग फाऊंडेशनच्या ऑनलाईन ‘बोधवारी’(Bodhwari) या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता.

यावेळी सिंधुताई सपकाळ(Sindhutai Sakpal) म्हणाल्या की, कोरोनानं फार दु:खं दिलं. त्यावर फुंकर घाला, बोध घेता घेता जगणं शिका. दुकानाची शटर बंद झाली पण पोटाची भूक बंद झाली नाही. कोरोना काळात तग धरा, ढासळू नका.वारीच्या निमित्ताने माणसांना कुठेतरी समाधान, आत्मिक सुख, मानसिक शांती मिळते. त्यामुळे एकमेकांची काळजी घ्या. सोबत चला. कोरोनानं ह्दय तोडली त्याला गाठ आपण मारू, कुणीही कुणाचं नसतं. कोरोनानं आत्मीयता कशी असते? जिव्हाळा कसा असतो? भूक काय असते? देण्याघेण्याची प्रवृत्ती कशी असते? हे शिकवलं असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत सव्वा वर्ष झालं मी घरात बसून आहे. दिवस विवंचनेत जायचा तर रात्रं टेन्शनमध्ये जात होती. लेकरं अपेक्षेने पाहत असतात. हे दिवसही निघून जातील. कोरोना कधीतरी संपणारच आहे. उद्याचा दिवस उगवणार आहे. फक्त वाट पाहणं आपल्या हातात आहे. सर्वांनी सर्वांची काळजी घ्या, एक घास वाटून खाऊ. मागे वळून पहा, किती अंतर आपण चालत आलोय. आपलं आयुष्य वाटून टाकण्यात धन्य मानतो. आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. घेतलेला वसा टाकू नका. कोलमडू नका पुन्हा नव्याने उभं राहू असा विश्वास सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘बोधवारी’च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचता येत आहे. सध्या लोक देवाला मानत नाही. देवा सगळ्याचं भलं कर पण सुरूवात माझ्यापासून कर अशी लोकांची भावना झाली आहे. वारी करणारी माणसं खूप मोठी नसतात ती सर्वसामान्य गरीब असतात. ते वारी करत करत देवाचं नाव घेत चालत असतात. संपूर्ण देशात ही वारी पोहचवली जात आहे हे खूप मोठं काम आहे. ‘बोधवारी’च्या माध्यमातून घराघरात पोहचता येते. विभूश्रीचं हे काम यापुढेही असेच राहो असं सिंधुताईंनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpur Wariपंढरपूर वारी