शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
5
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
7
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
8
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
9
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
10
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
11
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
12
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
13
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
14
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
15
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
16
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
17
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
18
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
19
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
20
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
Daily Top 2Weekly Top 5

“माझी लेकरं पाणी पिऊन झोपली अशी वेळ कोरोनानं आणली”; सिंधुताई सपकाळ भावूक झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 20:25 IST

सव्वा वर्ष झालं मी घरात बसून आहे. दिवस विवंचनेत जायचा तर रात्रं टेन्शनमध्ये जात होती

ठळक मुद्देकोरोना कधीतरी संपणारच आहे. उद्याचा दिवस उगवणार आहे. फक्त वाट पाहणं आपल्या हातात आहे. आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. घेतलेला वसा टाकू नका. दुकानाची शटर बंद झाली पण पोटाची भूक बंद झाली नाही.

मुंबई - कोरोनानं भाकरी हिरावून घेतली काम थांबली. कोरोनात अशी वेळ आली की माझी लेकरं पाणी पिऊन झोपली. भाकरीची भूक पाण्यावर का भागत नाही असं प्रश्न लेकरं विचारत होती. त्या प्रश्नांना उत्तर देता आलं नाही. मात्र अनेकांनी या काळात थोडी फार होईना मदत केली असं सांगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. बोधमार्ग फाऊंडेशनच्या ऑनलाईन ‘बोधवारी’(Bodhwari) या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता.

यावेळी सिंधुताई सपकाळ(Sindhutai Sakpal) म्हणाल्या की, कोरोनानं फार दु:खं दिलं. त्यावर फुंकर घाला, बोध घेता घेता जगणं शिका. दुकानाची शटर बंद झाली पण पोटाची भूक बंद झाली नाही. कोरोना काळात तग धरा, ढासळू नका.वारीच्या निमित्ताने माणसांना कुठेतरी समाधान, आत्मिक सुख, मानसिक शांती मिळते. त्यामुळे एकमेकांची काळजी घ्या. सोबत चला. कोरोनानं ह्दय तोडली त्याला गाठ आपण मारू, कुणीही कुणाचं नसतं. कोरोनानं आत्मीयता कशी असते? जिव्हाळा कसा असतो? भूक काय असते? देण्याघेण्याची प्रवृत्ती कशी असते? हे शिकवलं असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत सव्वा वर्ष झालं मी घरात बसून आहे. दिवस विवंचनेत जायचा तर रात्रं टेन्शनमध्ये जात होती. लेकरं अपेक्षेने पाहत असतात. हे दिवसही निघून जातील. कोरोना कधीतरी संपणारच आहे. उद्याचा दिवस उगवणार आहे. फक्त वाट पाहणं आपल्या हातात आहे. सर्वांनी सर्वांची काळजी घ्या, एक घास वाटून खाऊ. मागे वळून पहा, किती अंतर आपण चालत आलोय. आपलं आयुष्य वाटून टाकण्यात धन्य मानतो. आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. घेतलेला वसा टाकू नका. कोलमडू नका पुन्हा नव्याने उभं राहू असा विश्वास सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘बोधवारी’च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचता येत आहे. सध्या लोक देवाला मानत नाही. देवा सगळ्याचं भलं कर पण सुरूवात माझ्यापासून कर अशी लोकांची भावना झाली आहे. वारी करणारी माणसं खूप मोठी नसतात ती सर्वसामान्य गरीब असतात. ते वारी करत करत देवाचं नाव घेत चालत असतात. संपूर्ण देशात ही वारी पोहचवली जात आहे हे खूप मोठं काम आहे. ‘बोधवारी’च्या माध्यमातून घराघरात पोहचता येते. विभूश्रीचं हे काम यापुढेही असेच राहो असं सिंधुताईंनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpur Wariपंढरपूर वारी