शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सावधान, राज्यात पुन्हा कोरोनाचा अलर्ट; आरोग्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 08:57 IST

आशिया आणि युरोप खंडात संसर्गाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत.

मुंबई :  राज्यात कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरत असल्याने, आता कुठे दिलासा मिळाला आहे. मात्र, काही देशांत आता कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तापसदृश्य आजार आणि तीव्र श्वसन विकारांच्या आजारांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.आशिया आणि युरोप खंडात संसर्गाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. तापसदृश्य आजारांची आणि तीव्र श्वसन अडथळ्याचा संसर्ग चाचणी हे सरकारसाठी कोरोना नियंत्रणाचे मुख्य स्तंभ आहेत. आता सजगता वाढवून ताप आणि श्वसनविकाराच्या रुग्णांची कोरोना चाचणी करून, त्यातील पॉझिटिव्ह अहवाल जनुकीय संरचनेच्या तपासणीसाठी पाठवावेत, असे या आदेशात म्हटले आहे.बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची पालिकेकडून माहिती घेतली जात आहे, तसेच कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची माहिती गोळा केली जाते. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार करून कोरोना रोखण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त.पुन्हा आढावा बैठकाकोरोनाच्या तिसऱ्या लाटेने बाधित संख्येत उच्चांक गाठला. मात्र, लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्यूची संख्या खूप कमी झाली. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, दैनंदिन बाधित संख्या दोन आकडी झाली आहे, तर निर्बंध शिथिल झाले आहेत, तर अखेरची बैठक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात झाली. एक महिना उसंत नाही मिळत, तोच आशिया आणि युरोप खंडातील चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बैठका सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस