शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

महागाईचा तडाखा! डिझेलपाठोपाठ कोथिंबीरही १०० रुपयांवर; हिरवी मिरचीही २०० रुपये किलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 06:51 IST

वाहतूक खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर गगनाला

मुंबई : पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने बाजारपेठेत आवक कमी आणि वाढता वाहतूक खर्च यामुळे दामदुप्पट दराने भाजीपाला खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. मिरचीचे भाव कडाडून २०० रुपये किलो झाले असून कोथिंबिरीची जुडी ८० ते १००  रुपयांना मिळते आहे. त्याचा बजेटवर परिणाम झाला आहे.अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत आहे. त्यातच डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला ५० ते १२० रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागत आहे. गणेशोत्सव, गौरीपूजन, पितृपक्ष आणि नवरात्र उत्सव, दसरा या सणावारात मांसाहार बंद होता. त्यामुळे भाज्यांची विक्री वाढत त्या फार महागल्या आहेत. आधी ५ ते १० रुपये पाव किलो असलेली भाजी आता २० ते २५ रुपयांना खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे अनेक ग्राहक महागलेले दर ऐकून दुकानातून काहीच न घेता माघारी जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत. पाऊसही कमी-जास्त प्रमाणात असून, उत्पादन कमी आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत- अशोक सकट, भाजीपाला विक्रेतेकिरकोळ बाजारातील किंमत पालक     : ५० रुपये जुडीमेथी     : ५० ते ६० रुपयेभेंडी     : ६० ते ७० रुपयेसिमला मिरची     : ८० रुपयेफूल कोबी     : ८० रुपयेवांगी     : ९० रुपयेगवार     : १२० रुपयेटोमॅटो     : ८० ते १०० रुपयेकांदा     : ५० ते ६० रुपयेबटाटा     : ४० ते ६० रुपये