शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कोरेगाव-भीमाची घटना हे षड्यंत्रच!, मुख्यमंत्र्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 04:08 IST

समाजामध्ये दुही निर्माण करून सामाजिक सौहार्दाला सुरुंग लावण्याचे षड्यंत्र कोरेगाव-भीमा येथील हिंसक घटनांच्या मागे होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दिली.

मुंबई : समाजामध्ये दुही निर्माण करून सामाजिक सौहार्दाला सुरुंग लावण्याचे षड्यंत्र कोरेगाव-भीमा येथील हिंसक घटनांच्या मागे होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दिली. खा. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव-भीमाप्रकरणी निवेदन केले. ते म्हणाले की, दंगल घडवून राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र होते. मात्र, सरकारने परिस्थिती व्यवस्थित हाताळल्यामुळे दंगलीचे लोण राज्यभर पसरले नाही. या घटनेत हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे सांगून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता केला.संविधान बचाव रॅलीला तिरंगा रॅलीने प्रत्युत्तरकाही विरोधी पक्षांकडून प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव रॅली काढण्यात येणार असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याच दिवशी भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात येतील, असे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले. यापुढेही अशा जातीय तणाव वाढविणाºया घटना घडू शकतात. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांत मिसळून सलोखा कायम राखण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. या बैठकीत पक्षविस्तार योजनेचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाºयांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस