शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे का!

By admin | Updated: December 17, 2014 02:53 IST

सगळ्या क्षेत्रात राजकारणी मंडळी चालतात. मग साहित्य संमेलनातच त्यांना अस्पृश्य का मानले जाते. संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे

पुणे : सगळ्या क्षेत्रात राजकारणी मंडळी चालतात. मग साहित्य संमेलनातच त्यांना अस्पृश्य का मानले जाते. संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे का, असा सवाल नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी उपस्थित करीत संमेलनातील राजकारण्यांच्या सहभागाबद्दल एकप्रकारे समर्थनच दर्शविले. संमेलनामध्ये स्वागताध्यक्षापासून ते उद्घाटकापर्यंत राजकारण्यांचा सहभागाबद्दल नेहमीच टिकेची झोड उठविली जाते़ मात्र डॉ. मोरे म्हणाले, राजकीय मंडळीचा वावर हा सर्वच क्षेत्रात वाढला आहे़ तिथे राजकारणी चालतात मग साहित्य क्षेत्रातच त्यांना अस्पृश्य का समजले जाते. संमेलनात कुणी राजकीय नेता आला की त्याचे स्वागत करण्याची प्रथा आहे. मात्र ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे. कुणी किती झुकायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे मंगळवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात डॉ. मोरे बोलत होते. शहराबरोबरच ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे सध्या सर्वत्र पेव फुटले असल्याने मराठी शाळा बंद पडत आहेत़ सरकारने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे, या विचारप्रवाहावरही डॉ. मोरे यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले, सरकारने काय काय करायचे? आपली काही कर्तव्ये नाहीत का? ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे म्हणून एवढी ओरड केली जात आहे. मग शहरी भागांचे काय? हा दुटप्पीपणा नाही का? ग्रामीण आणि शहरी असा भेदच करता कामा नये.