शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे का!

By admin | Updated: December 17, 2014 02:53 IST

सगळ्या क्षेत्रात राजकारणी मंडळी चालतात. मग साहित्य संमेलनातच त्यांना अस्पृश्य का मानले जाते. संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे

पुणे : सगळ्या क्षेत्रात राजकारणी मंडळी चालतात. मग साहित्य संमेलनातच त्यांना अस्पृश्य का मानले जाते. संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा आहे का, असा सवाल नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी उपस्थित करीत संमेलनातील राजकारण्यांच्या सहभागाबद्दल एकप्रकारे समर्थनच दर्शविले. संमेलनामध्ये स्वागताध्यक्षापासून ते उद्घाटकापर्यंत राजकारण्यांचा सहभागाबद्दल नेहमीच टिकेची झोड उठविली जाते़ मात्र डॉ. मोरे म्हणाले, राजकीय मंडळीचा वावर हा सर्वच क्षेत्रात वाढला आहे़ तिथे राजकारणी चालतात मग साहित्य क्षेत्रातच त्यांना अस्पृश्य का समजले जाते. संमेलनात कुणी राजकीय नेता आला की त्याचे स्वागत करण्याची प्रथा आहे. मात्र ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे. कुणी किती झुकायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे मंगळवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात डॉ. मोरे बोलत होते. शहराबरोबरच ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे सध्या सर्वत्र पेव फुटले असल्याने मराठी शाळा बंद पडत आहेत़ सरकारने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे, या विचारप्रवाहावरही डॉ. मोरे यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले, सरकारने काय काय करायचे? आपली काही कर्तव्ये नाहीत का? ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे म्हणून एवढी ओरड केली जात आहे. मग शहरी भागांचे काय? हा दुटप्पीपणा नाही का? ग्रामीण आणि शहरी असा भेदच करता कामा नये.