शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

३० हजार शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर? आधार प्रमाणीकरणात अतिरिक्त ठरण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 07:42 IST

राज्य सरकारने गेल्या वर्षी शाळांना अनुदान मंजूर करताना विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणावर प्रत्येक शाळेची संचमान्यता मंजूर करण्यास सांगितले आहे.

जळगाव : विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा शेवटचा टप्पा शिक्षण संस्थांसाठी अडचणीचा ठरत असून, राज्यातील ३० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे आधारला पर्यायी व्यवस्था शिक्षण विभागाने स्वीकारावी, अशी मागणी संस्थाचालक करत आहेत. राज्याच्या आकडेवारीनुसार अजूनही ७,१०,६३२ विद्यार्थ्यांचे आधार मॅच झालेले नाही आणि ३,१८,९६६ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. 

राज्य सरकारने गेल्या वर्षी शाळांना अनुदान मंजूर करताना विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणावर प्रत्येक शाळेची संचमान्यता मंजूर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी १५ जून २०२३ अंतिम मुदत होती; पण आजही प्रमाणीकरणाचे १०० टक्के काम झालेले नाही. त्यामुळे अंतिम संचमान्यता निघालेल्या नाहीत. आधारनुसार विद्यार्थीसंख्या गृहित धरल्यास ३० हजारपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा मुद्दा गाजला.

राज्य सरकार आधार प्रमाणीकरणाचा आग्रह धरत असल्याने २४ लाख विद्यार्थी संच मान्यतेच्या बाहेर जातील, त्या तुलनेत शिक्षक अतिरिक्त ठरतील. यामुळे नवीन शिक्षक भरतीदेखील अडचणीत येणार असल्याच्या मुद्द्याकडे काही पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. रिक्त असलेली चार ते पाच हजार पदे भरून त्यांना शाळांमध्ये तपासणी करायला पाठवा, अशीही मागणी होत आहे. 

अडचणी समजून घेणार तरी केव्हा... माजी मंत्री विजय नवल पाटील म्हणाले, की शाळा प्रवेशात आधारचा संबंध जोडू नका, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने दिला आहे. आधार प्रमाणीकरणात अडचणी येत आहेत.  विद्यार्थ्यांचे फोटो नसतात, काहींच्या अंगठ्याचे ठसे उमटत नाहीत, पालकांकडे मोबाइल नसतात. ग्रामीण भागात लहान मुलांचे आधार जन्मल्याबरोबर निघत नाही. त्यामुळे शिक्षकांना अडचणी येतात.

राज्यात आधारची स्थितीआधारनुसार विद्यार्थी    २,०८,७३,६६८आधार नसलेले विद्यार्थी    ३,१८,९६६अवैध आधार    ८,९५,६३७मिसमॅच आधार    ७,१०,६३२वैध आधार %    ९०.९२

शिक्षण विभागात ७० टक्के पदे रिक्त आहेत, ती भरावीत. विद्यार्थ्यांची शहानिशा करून त्यांची संख्या ठरवा.     - विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

टॅग्स :Teacherशिक्षक