शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देशद्रोहाचे ‘ते’ वादग्रस्त परिपत्रक अखेर मागे

By admin | Updated: October 28, 2015 02:34 IST

सरकार किंवा शासनाच्या प्रतिनिधींवर टीका केल्यास देशद्रोहाचा खटला भरण्याबाबतचे वादग्रस्त परिपत्रक अखेर राज्य सरकारने मागे घेतले

मुंबई : सरकार किंवा शासनाच्या प्रतिनिधींवर टीका केल्यास देशद्रोहाचा खटला भरण्याबाबतचे वादग्रस्त परिपत्रक अखेर राज्य सरकारने मागे घेतले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयासमोर सांगितले. देशद्रोहाच्या गुन्ह्यासंबंधीच्या भारतीय दंड विधानातील १२४ (अ)चा गैरवापर होऊ नये, यासाठी २७ आॅगस्ट २०१५ रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे विरोधी पक्षांसह सामान्यांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी आणि वकील नरेंद्र शर्मा यांनी याविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. महिनाभरापूर्वी खंडपीठाने राज्य सरकारला या परिपत्रकात सुधारणा करा किंवा हे परिपत्रक रद्द करा, असे म्हणत राज्य सरकार निर्णय घेईपर्यंत या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यास स्थगिती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी कायदेतज्ज्ञ व मुख्य सचिवांचा सल्ला घेऊन परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंगळवारी अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला दिली. हे परिपत्रक कोणी काढले, याचीही चौकशी मुख्यमंत्री करणार आहेत, अशी माहिती अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला दिली. सरकारने परिपत्रक मागे घेतल्याने खंडपीठाने या दोन्ही जनहित याचिका निकाली काढल्या. (प्रतिनिधी)राज्य शासनाचे हे परिपत्रकदेखील भाजपाच्या याच हुकूमशाही मानसिकतेतून उचललेले पाऊल होते. न्यायालयाच्या आदेशांचा चुकीचा अर्थ लावून सरकारने आपला छुपा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केला. फडणवीस सरकारवर हे अन्यायी, अलोकतांत्रिक परिपत्रक मागे घेण्याची वेळ ओढवली. हा लोकशाहीचा विजय असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.