शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजांची डाळ शिजू न देता डाळीचे दर नियंत्रणात आणा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 20, 2015 09:09 IST

डाळींच्या वाढत्या किमतींबाबत चिंता व्यक्त करत सरकारने साठेबाजांची डाळ शिजू न देता, त्यांच्यावर कारवाई करून दरवाढ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करावे, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - डाळींच्या गगनाला भिडलेल्या किमतींबाबत चिंता व्यक्त करत सरकारने साठेबाजांची डाळ शिजू न देता, त्यांच्यावर कारवाई करून दरवाढ तातडीने नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करावे, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला आहे. या डाळींच्या दरवाढीमुळे सामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले असून ते पुसण्याची गरज असल्याचे मत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे. 
गॅसवर किंवा चुलीवर शिजणारी डाळ आता सोशल मीडियावरच जास्त शिजू लागली आहे. प्रचंड भाववाढीमुळे स्वयंपाकघरातील डाळींना ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर स्थान मिळाले आहे. यासंबंधी अनेक विनोद चेहर्‍यावर क्षणभर हसू  खुलवत असले तरी त्यामागचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे.  काही महिन्यंपूर्वी कांद्याने शंभरी गाठली असता आयात कांद्याचा उतारा करून सरकारने कांद्याची दरवाढ नियंत्रणात आणली होती. डाळींचे दर खाली आणण्यासाठीही अशाच उपाययोजनांची गरज आहे, असे उद्धव यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आता साठेबाजीवर अंकुश आणण्यासाठी पावले उचलली आहेत. डाळींची साठेबाजी आणि काळाबाजार करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत हे चांगलेच असले तरीही त्यामुळे डाळींनी भाववाढीचा जो विक्रम मोडला आहे तोदेखील लवकरात लवकर मोडीत निघावा अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली आहे. 
डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आयातदार-निर्यातदार, मोठे रिटेलर्स, बडे घाऊक विक्रेते, अन्न प्रक्रियादार यांना डाळींच्या साठ्याचे प्रमाण ठरवून दिले आहे. त्यानुसारच त्यांना डाळींचा साठा यापुढे करता येईल. त्यामुळे भाववाढीच्या शर्यतीत डाळी जरी भरपूर पुढे निघून गेल्या तरी आता सरकारच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या भाववाढीचा वेग मंदावेल आणि डाळींचे दर किमान पातळीवर यायला हरकत नाही. तूरडाळीने किलोमागे २०० रुपये पार केले असतानाच उडीद डाळही डीदशेपर्यंत पोचली आहे. इतर डाळीदेखील दरवाढीबाबत एकमेकींशी स्पर्धाच करीत आहेत. त्यामुळे सरकारतर्फे हालचाल होत असली तरी परिस्थिती नियंत्रणात यायला अवधी लागू शकतो. तो कसा कमीत कमी लागेल याकडे आता सरकारने लक्ष द्यायला हवे, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
दुष्काळ आणि इतर कारणांमुळे देशांतर्गत डाळींचे उत्पादन कमी झाले. उत्पादनातील ही घट आयात डाळीच्या रूपात भरून काढायला मर्यादा आहेत, त्यात कृत्रिम साठेबाजीमुळे डाळींची भाववाढ गगनाला भिडली ही वस्तुस्थिती असली तरी साठेबाजांविरुद्ध कारवाईची ‘डाळ’ कशी शिजेल, दरवाढ तातडीने नियंत्रणात कशी येईल, यावर केंद्र व राज्य सरकारांने लक्ष केंद्रित करायला हवे, तरच निदान दिवाळीपर्यंत डाळींचे भाव आटोक्यात येतील. डाळींच्या साठ्यावर नियंत्रण आणि साठेबाजांविरुद्ध कारवाई असा दुहेरी बडगा सरकारने उगारला आहे. त्यामुळे भाववाढीचा ‘डाळ तडका’ कमी होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.