शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजांची डाळ शिजू न देता डाळीचे दर नियंत्रणात आणा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 20, 2015 09:09 IST

डाळींच्या वाढत्या किमतींबाबत चिंता व्यक्त करत सरकारने साठेबाजांची डाळ शिजू न देता, त्यांच्यावर कारवाई करून दरवाढ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करावे, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - डाळींच्या गगनाला भिडलेल्या किमतींबाबत चिंता व्यक्त करत सरकारने साठेबाजांची डाळ शिजू न देता, त्यांच्यावर कारवाई करून दरवाढ तातडीने नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करावे, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला आहे. या डाळींच्या दरवाढीमुळे सामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले असून ते पुसण्याची गरज असल्याचे मत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे. 
गॅसवर किंवा चुलीवर शिजणारी डाळ आता सोशल मीडियावरच जास्त शिजू लागली आहे. प्रचंड भाववाढीमुळे स्वयंपाकघरातील डाळींना ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर स्थान मिळाले आहे. यासंबंधी अनेक विनोद चेहर्‍यावर क्षणभर हसू  खुलवत असले तरी त्यामागचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे.  काही महिन्यंपूर्वी कांद्याने शंभरी गाठली असता आयात कांद्याचा उतारा करून सरकारने कांद्याची दरवाढ नियंत्रणात आणली होती. डाळींचे दर खाली आणण्यासाठीही अशाच उपाययोजनांची गरज आहे, असे उद्धव यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आता साठेबाजीवर अंकुश आणण्यासाठी पावले उचलली आहेत. डाळींची साठेबाजी आणि काळाबाजार करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत हे चांगलेच असले तरीही त्यामुळे डाळींनी भाववाढीचा जो विक्रम मोडला आहे तोदेखील लवकरात लवकर मोडीत निघावा अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली आहे. 
डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आयातदार-निर्यातदार, मोठे रिटेलर्स, बडे घाऊक विक्रेते, अन्न प्रक्रियादार यांना डाळींच्या साठ्याचे प्रमाण ठरवून दिले आहे. त्यानुसारच त्यांना डाळींचा साठा यापुढे करता येईल. त्यामुळे भाववाढीच्या शर्यतीत डाळी जरी भरपूर पुढे निघून गेल्या तरी आता सरकारच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या भाववाढीचा वेग मंदावेल आणि डाळींचे दर किमान पातळीवर यायला हरकत नाही. तूरडाळीने किलोमागे २०० रुपये पार केले असतानाच उडीद डाळही डीदशेपर्यंत पोचली आहे. इतर डाळीदेखील दरवाढीबाबत एकमेकींशी स्पर्धाच करीत आहेत. त्यामुळे सरकारतर्फे हालचाल होत असली तरी परिस्थिती नियंत्रणात यायला अवधी लागू शकतो. तो कसा कमीत कमी लागेल याकडे आता सरकारने लक्ष द्यायला हवे, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
दुष्काळ आणि इतर कारणांमुळे देशांतर्गत डाळींचे उत्पादन कमी झाले. उत्पादनातील ही घट आयात डाळीच्या रूपात भरून काढायला मर्यादा आहेत, त्यात कृत्रिम साठेबाजीमुळे डाळींची भाववाढ गगनाला भिडली ही वस्तुस्थिती असली तरी साठेबाजांविरुद्ध कारवाईची ‘डाळ’ कशी शिजेल, दरवाढ तातडीने नियंत्रणात कशी येईल, यावर केंद्र व राज्य सरकारांने लक्ष केंद्रित करायला हवे, तरच निदान दिवाळीपर्यंत डाळींचे भाव आटोक्यात येतील. डाळींच्या साठ्यावर नियंत्रण आणि साठेबाजांविरुद्ध कारवाई असा दुहेरी बडगा सरकारने उगारला आहे. त्यामुळे भाववाढीचा ‘डाळ तडका’ कमी होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.