शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

ठेकेदार-अभियंत्याच्या नाकर्तेपणा

By admin | Updated: September 21, 2015 01:23 IST

मुरबाड तालुक्यातील माळ, मोरोशी, खुटल येथे सहा वर्षांपूर्वी एक कोटी वीस लाख खर्च करून बांधलेल्या आश्रमशाळांसह वसतिगृहाचे बांधकाम अर्धवट असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे.

टोकावडे : मुरबाड तालुक्यातील माळ, मोरोशी, खुटल येथे सहा वर्षांपूर्वी एक कोटी वीस लाख खर्च करून बांधलेल्या आश्रमशाळांसह वसतिगृहाचे बांधकाम अर्धवट असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे.या तिन्ही आश्रमशाळांत विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली. येथे मुलामुलींसाठी स्वतंत्र निवासाची सोय केलेली आहे. मात्र, दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने व पूर्वीचे वसतिगृह अपूर्ण पडत असल्याने शासनाने २००९ मध्ये प्रत्येकी ४० लाख असा १ कोटी २० लाखांचा निधी या तीन आश्रमशाळांत स्वतंत्र वसतिगृह बांधण्यास मंजुरी देऊन निविदा काढून कामाला सुरुवात केली. या तीनही ठिकाणी वेगवेगळ्या तीन ठेकेदारांनी बांधकाम केले. परंतु, त्यांनी बांधकाम अर्धवट ठेवून रक्कम मात्र संपूर्ण काढली. आज या तिन्ही इमारतींचे प्लॅस्टर, लादी, विद्युतीकरण, खिडक्या, दरवाजे अशी अनेक कामे अपूर्ण असताना तत्कालीन अभियंत्याशी संगनमताने आलेला निधी काढला आहे.