शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

वैतरणा, पिंजाळवर बंधारे बांधा

By admin | Updated: May 14, 2017 02:25 IST

शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेले वैतरणेचे पाणी कोकाकोला १५ किमी अंतरावरून घेते मग पुरेसा निधी उपलब्ध केला

वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेले वैतरणेचे पाणी कोकाकोला १५ किमी अंतरावरून घेते मग पुरेसा निधी उपलब्ध केला तर येथील नागरिकांना ते का मिळू शकणार नाही. प्रस्तावित प्रस्तावित पिंजाळ प्रकल्पातील काही टक्के पाणी या तालुक्याला मिळाल्यास पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागणार नाही. तालुक्यातील नद्यांवरून १० कि.मी. अंतरावर बंधारे बांधून पाणी अडविले तर केवळ पिण्याचाच नाही तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल. मात्र लोकप्रतिनिधी क्रियाशील नसल्यामुळे तालुका तहानलेला आहे.वाडा: तालुक्याला पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. पंरतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने तो तहानलेला आहे. हा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी प्रत्येक नदीवर १० कि.मी. वर बंधारे बांधल्यास व तालुक्यात १६८ खेडी व २०० हून अधिक पाडे आहेत. ८६ ग्रामपंचायती आहेत. आजमितीस तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. येथे औद्यागिकीकरणाला वेग वाढत असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र लोकसंख्येच्या मानात पाणी समस्येचे निराकरण होत नाही. तालुक्याला बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, पिंजाळ, तानसा, गारगाई व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. मात्र पाण्याचा लाभ या तालुक्याला मिळवून देणारे लोकप्रतिनिधी न मिळाल्याने पाण्याची समस्या सुटू शकलेली नाही. यासाठी आदीवासी विकासमंत्री विष्णू सवरा व इतर सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.मागील वर्षी खासदार हेमंत गोडसेकडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा वाडा तालुक्यातील पिंजाळ व गारगाई नदीचे वाया जाणारे पाणी देव नदीत टाळण्यासाठी आग्रही असणारे तेथील खासदार गोडसे यांची तसा प्रस्ताव बनवून तो केंद्र सरकारला सादर करून केंद्र सरकारकडून त्यांचे सेर्वेक्षण देखील सुरू होते. नाशिकचे खासदार असा प्रस्ताव सादर करून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पालघर जिल्ह्यातील वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींना सूचत नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका श्रीकांत भोईर यांनी केली. उद्योजकांची बाजूही लक्षात घ्यावीऔद्योगिकरण व त्यामुळे वाढलेल्या वस्तीला पाणी पुरवठा करणे ही अनेक गावांची समस्या बनली आहे. कारखानदारांना सरकारने पाणी दिले नाही. त्यामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली कारखानदारी धोक्यात आली आहे. केवळ पाण्यामुळे उत्पादन कमी होत आहे असे उद्योजकांचे म्हणणे आहे.या गावांचे प्रस्ताव प्रलंबितदुर्गम भाग रोकरे पाडा, जांभूळपाडा, साखरशेत, आणेवाडी, दिवेपाडा या गावांना टँकरने पाण पुरवठा चालू करण्यात आला आहे तर येणारा उज्जैनी, वळवी पाडा, थापरपाडा, पाचघर, निळमाळ, तोरणे, चिंचेपाडा , रोजगार, ककडपाडा, बेलखाचर, कुसवडे, वांगणपाडा, मोरसेपाडा, ठाकूरपाडा, फणसपाडा, वारलीपाडा या गावांना पाणीटंचाई असून त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असून त्यांची मान्यता मिळाली की, लगेचच या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केली जाईल, अशी माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे शाख अभियंता प्रमोद भोईर यांनी दिली. खोदाई मर्यादा ३५० फूट करासरकारकडून कूपलिकांची खोदाई २०० फूटांपर्यंत करण्याचा नियम आहे. व सध्या पाण्याची पातळी खोल गेल्याने काही ठिकाणी २०० फुटांपर्यंत पाणी लागत नाही व केलेला खर्च वाया जातो त्यामुळे हा नियम बदलून ३५० फुटापर्यंत खोदाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंग पणरे यांनी दिली आहे.