शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा, पिंजाळवर बंधारे बांधा

By admin | Updated: May 14, 2017 02:25 IST

शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेले वैतरणेचे पाणी कोकाकोला १५ किमी अंतरावरून घेते मग पुरेसा निधी उपलब्ध केला

वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : शेतकऱ्यांसाठी आरक्षित असलेले वैतरणेचे पाणी कोकाकोला १५ किमी अंतरावरून घेते मग पुरेसा निधी उपलब्ध केला तर येथील नागरिकांना ते का मिळू शकणार नाही. प्रस्तावित प्रस्तावित पिंजाळ प्रकल्पातील काही टक्के पाणी या तालुक्याला मिळाल्यास पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागणार नाही. तालुक्यातील नद्यांवरून १० कि.मी. अंतरावर बंधारे बांधून पाणी अडविले तर केवळ पिण्याचाच नाही तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल. मात्र लोकप्रतिनिधी क्रियाशील नसल्यामुळे तालुका तहानलेला आहे.वाडा: तालुक्याला पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. पंरतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने तो तहानलेला आहे. हा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी प्रत्येक नदीवर १० कि.मी. वर बंधारे बांधल्यास व तालुक्यात १६८ खेडी व २०० हून अधिक पाडे आहेत. ८६ ग्रामपंचायती आहेत. आजमितीस तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. येथे औद्यागिकीकरणाला वेग वाढत असून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र लोकसंख्येच्या मानात पाणी समस्येचे निराकरण होत नाही. तालुक्याला बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, पिंजाळ, तानसा, गारगाई व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान लाभले आहे. मात्र पाण्याचा लाभ या तालुक्याला मिळवून देणारे लोकप्रतिनिधी न मिळाल्याने पाण्याची समस्या सुटू शकलेली नाही. यासाठी आदीवासी विकासमंत्री विष्णू सवरा व इतर सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.मागील वर्षी खासदार हेमंत गोडसेकडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा वाडा तालुक्यातील पिंजाळ व गारगाई नदीचे वाया जाणारे पाणी देव नदीत टाळण्यासाठी आग्रही असणारे तेथील खासदार गोडसे यांची तसा प्रस्ताव बनवून तो केंद्र सरकारला सादर करून केंद्र सरकारकडून त्यांचे सेर्वेक्षण देखील सुरू होते. नाशिकचे खासदार असा प्रस्ताव सादर करून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पालघर जिल्ह्यातील वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींना सूचत नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका श्रीकांत भोईर यांनी केली. उद्योजकांची बाजूही लक्षात घ्यावीऔद्योगिकरण व त्यामुळे वाढलेल्या वस्तीला पाणी पुरवठा करणे ही अनेक गावांची समस्या बनली आहे. कारखानदारांना सरकारने पाणी दिले नाही. त्यामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली कारखानदारी धोक्यात आली आहे. केवळ पाण्यामुळे उत्पादन कमी होत आहे असे उद्योजकांचे म्हणणे आहे.या गावांचे प्रस्ताव प्रलंबितदुर्गम भाग रोकरे पाडा, जांभूळपाडा, साखरशेत, आणेवाडी, दिवेपाडा या गावांना टँकरने पाण पुरवठा चालू करण्यात आला आहे तर येणारा उज्जैनी, वळवी पाडा, थापरपाडा, पाचघर, निळमाळ, तोरणे, चिंचेपाडा , रोजगार, ककडपाडा, बेलखाचर, कुसवडे, वांगणपाडा, मोरसेपाडा, ठाकूरपाडा, फणसपाडा, वारलीपाडा या गावांना पाणीटंचाई असून त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असून त्यांची मान्यता मिळाली की, लगेचच या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केली जाईल, अशी माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे शाख अभियंता प्रमोद भोईर यांनी दिली. खोदाई मर्यादा ३५० फूट करासरकारकडून कूपलिकांची खोदाई २०० फूटांपर्यंत करण्याचा नियम आहे. व सध्या पाण्याची पातळी खोल गेल्याने काही ठिकाणी २०० फुटांपर्यंत पाणी लागत नाही व केलेला खर्च वाया जातो त्यामुळे हा नियम बदलून ३५० फुटापर्यंत खोदाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंग पणरे यांनी दिली आहे.