शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:37 IST

महाराष्ट्र विधानमंडळाकडून झालेला सत्कार हे राज्यातील १२.८७ कोटी जनतेचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांनी आपले वडील माजी राज्यपाल स्व. रा. सू. गवई यांच्या विधिमंडळातील आठवणींनाही उजाळा दिला.

मुंबई : व्यक्तींना पदे मिळतात ती सत्ता नसते, संविधानिक पदावर व्यक्ती जातो तेव्हा त्यालाही घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करणे अभिप्रेत असते. आपल्या देशाची राज्यघटना ही या देशात रक्तविरहित क्रांती निर्माण करण्याचे शस्त्र आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले.

सरन्यायाधीश गवई यांचा विधिमंडळातर्फे विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात सत्कार मंगळवारी करण्यात आला. यावेळी ‘भारताची राज्यघटना’ या विषयावर त्यांचे भाषण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तसेच दोन्ही सभागृहातील सर्व पक्षांचे गटनेते, प्रतोद उपस्थित होते.

‘हे राज्यातील १२.८७ कोटी जनतेचे आशीर्वाद’सरन्यायाधीश गवई म्हणाले, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय व समता हे मूल्य जपण्यात कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका या तीनही स्तंभांना यश आले आहे. संविधानाच्या ७५ व्या वर्षात सरन्यायाधीश होण्याचा योग आला, याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्र विधानमंडळाकडून झालेला सत्कार हे राज्यातील १२.८७ कोटी जनतेचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांनी आपले वडील माजी राज्यपाल स्व. रा. सू. गवई यांच्या विधिमंडळातील आठवणींनाही उजाळा दिला.

‘राजकीय लोकशाही अबाधित ठेवली’बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते की, संविधान केवळ केंद्राभिमुख किंवा संघराज्यवादी नाही. हे संविधान युद्धाच्या व शांततेच्या काळात देशाला एकत्र ठेवणारे आहे, याची आठवण सरन्यायाधीश गवई यांनी यावेळी करून दिली. अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांनी केलेल्या कायद्यांना मान्यता देताना किंवा बाद करताना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लोकशाही अबाधित ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले.

कायद्यातून पाहिले व्यापक जनहित : फडणवीससरन्यायाधीश गवई यांचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकदा लोक न्यायाधीश, सरन्यायाधीश झाले की, कोषात जातात, पण गवई कोषात गेले नाहीत, ते सगळ्यांसाठी उपलब्ध राहिले. कायद्यात व्यापक जनहित कसे बसवता येईल, असे निर्णय त्यांनी उच्च न्यायालयात असताना दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम गोऱ्हे यांनी केले, तर राम शिंदे यांनी प्रास्ताविक केले, आभार राहुल नार्वेकर यांनी मानले. यावेळी एकनाथ शिंदे, अजित पवार, अंबादास दानवे यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र