शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मतदारसंघ, हिंगोली : युतीचा उमेदवारच निश्चित होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 05:56 IST

हिंगोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सध्याचे खा.राजीव सातव यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार कोण, हेच अद्याप नक्की नाही.

- विजय पाटील  हिंगोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सध्याचे खा.राजीव सातव यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार कोण, हेच अद्याप नक्की नाही. मुळात या दोन पक्षांत युती होईल, की ते स्वतंत्रपणे लढतील, हेही ठरलेले नाही. त्यामुळे भाजपा व शिवसेनेचे डझनभर इच्छुक मतदारसंघाची वारी करीत आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ही जागा घेऊन काँग्रेसने कळमनुरीचे तत्कालीन आ. राजीव सातव यांना मैदानात उतरविले होते. शिवसेनेचे खा. सुभाष वानखेडे यांच्याशी झालेल्या लढतीत मोदी लाटेतही महाराष्ट्रात टिकाव धरलेल्या काँग्रेसच्या दोघांपैकी खा. सातव हे एक होते.मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. युतीत ही जागा ज्या सेनेकडे जाईल, असे वाटते. त्यांच्याकडे प्रबळ चेहरा नाही. त्यामुळे काही दिवसांपासून वसमतचे सेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा यांनी प्रयत्न चालवले आहेत. उमरखेडचे माजी आ. प्रकाश पाटीलही अधूनमधून चेहरा दाखवत असतात. मात्र परभणीचे आ.राहुल पाटील, हदगावचे आ. नागेश पाटील आष्टीकर व नांदेडचे आ. हेमंत पाटील हेही मतदारसंघावर डोळा ठेवून आहे. युती झाल्यास भाजपाला ही जागा मिळेल की नाही, याची काहीच शाश्वती नाही. मात्र मागील लोकसभेनंतर तीन माजी खासदार भाजपात गेले. यात सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील व अ‍ॅड. शिवाजी माने यांचा समावेश होता. हे तिघेही लोकसभा उमेदवारीवर दावा करीत आहेत.यापैकी वानखेडे आता हदगाव विधानसभेकडेच लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. मात्र उर्वरित दोघांना लोकसभा उमेदवारीची आस आहे. या तिघांमध्येच तगडी स्पर्धा असताना भाजपा म्हणजे विजयाचे गणित असे समजून इतरही अर्धा डझन लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र उमेदवारी मिळण्यापूर्वीच ते बाद होतील, असे दिसते.या निवडणुकीत खा. सातव यांना टक्कर द्यायची झाल्यास विरोधकांना वेळीच उमेदवार ठरवावा लागणार आहे. मात्र वरिष्ठ स्तरावर युतीच्या चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. त्यातच जागा शिवसेनेची असताना भाजपाचीच मंडळी जोरात कामाला लागल्यासारखे दाखवत असल्याने शिवसेनाही संभ्रमात आहे. शिवसेनेने दावा मात्र सोडलेला नाही. युती नाही झाली तर तयारी असावी, यासाठी भाजपाच्या आखलेल्या व्यूहरचनेचा हा भाग असू शकेल. अन्यथा या इच्छुकांपैकी काही नाहकच अपक्ष वा बंडखोर म्हणून डोकेदुखी करायला मैदानात उतरण्याची भीती नाकारता येत नाही. मागच्या वेळी २२ उमेदवार रिंगणात होते. नामसाधर्म्य असलेल्या अनेकांना पक्षीय तिकिटावर उभे केले होते. अशांनीही मोठी मते खाल्ली. त्यामुळे अवघ्या १६३२ मतांनीच राजीव सातव विजयी झाले होते. जातीय समीकरणासाठीही काहींचा उपयोग घेतला जाऊ शकतो.सध्याची परिस्थितीमागच्या वेळी सेनेतील काहींनी काँग्रेसला मदत केली होती. त्यात बरीच फाटाफूट झाली. सेनाही बॅकफूटवर असून मागच्या लोकसभेपूर्वी वादाचे व सेनेच्या पराभवाचे कारण ठरलेल्या जि.प.त राकाँ-काँग्रेससोबतच सत्तेत आहे. गेल्या वेळी आपली हक्काची जागा काँग्रेसने हिसकावल्याची नाराजी राष्ट्रवादीतील काही मंडळीत होती. ती यंदा दिसत नाही.मतदारसंघाची रचना विचित्र आहे. यवतमाळ, नांदेड व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघात प्रचार करायचा झाल्यास पूर्वतयारी गरजेची आहे. आताही खासदार असणे ही सातव यांची ही जमेची बाजू. विरोधकांना चेहरा ठरत नसल्याने अडचण.मागच्यावेळीही काँग्रेसमध्ये शिवसेनेप्रमाणेच गटबाजी होती. मात्र ती कमी होती. आता ती वाढली. शिवाय इतरही पक्षांमध्ये याची काही कमी नाही. हा गोंधळ निवडणुकीवर कसा परिणाम करणारा ठरतो, यातच विजयाची गणिते सामावली आहेत.इतरत्र जोरदार चर्चा असलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीचे इकडे वारे नाही. तर ऐनवेळी काही पक्ष नशीब अजमावतात. कुणी बडा नेता गळाला न लागल्यास लढायची म्हणून निवडणूक लढणार, असे चित्र आहे.२०१४ मध्ये मिळालेली मते4,67,397राजीव सातव(काँग्रेस)4,65,765सुभाष वानखेडे(शिवसेना)25,145चुन्नीलाल मोहन जाधव(बसपा)14,986डी.बी. नाईक(माकप)6,126उत्तम पांडुरंग राठोड(बमुपा) 

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूकRajeev Satavराजीव सातव