शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघ, हिंगोली : युतीचा उमेदवारच निश्चित होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 05:56 IST

हिंगोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सध्याचे खा.राजीव सातव यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार कोण, हेच अद्याप नक्की नाही.

- विजय पाटील  हिंगोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सध्याचे खा.राजीव सातव यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार कोण, हेच अद्याप नक्की नाही. मुळात या दोन पक्षांत युती होईल, की ते स्वतंत्रपणे लढतील, हेही ठरलेले नाही. त्यामुळे भाजपा व शिवसेनेचे डझनभर इच्छुक मतदारसंघाची वारी करीत आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ही जागा घेऊन काँग्रेसने कळमनुरीचे तत्कालीन आ. राजीव सातव यांना मैदानात उतरविले होते. शिवसेनेचे खा. सुभाष वानखेडे यांच्याशी झालेल्या लढतीत मोदी लाटेतही महाराष्ट्रात टिकाव धरलेल्या काँग्रेसच्या दोघांपैकी खा. सातव हे एक होते.मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. युतीत ही जागा ज्या सेनेकडे जाईल, असे वाटते. त्यांच्याकडे प्रबळ चेहरा नाही. त्यामुळे काही दिवसांपासून वसमतचे सेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा यांनी प्रयत्न चालवले आहेत. उमरखेडचे माजी आ. प्रकाश पाटीलही अधूनमधून चेहरा दाखवत असतात. मात्र परभणीचे आ.राहुल पाटील, हदगावचे आ. नागेश पाटील आष्टीकर व नांदेडचे आ. हेमंत पाटील हेही मतदारसंघावर डोळा ठेवून आहे. युती झाल्यास भाजपाला ही जागा मिळेल की नाही, याची काहीच शाश्वती नाही. मात्र मागील लोकसभेनंतर तीन माजी खासदार भाजपात गेले. यात सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील व अ‍ॅड. शिवाजी माने यांचा समावेश होता. हे तिघेही लोकसभा उमेदवारीवर दावा करीत आहेत.यापैकी वानखेडे आता हदगाव विधानसभेकडेच लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. मात्र उर्वरित दोघांना लोकसभा उमेदवारीची आस आहे. या तिघांमध्येच तगडी स्पर्धा असताना भाजपा म्हणजे विजयाचे गणित असे समजून इतरही अर्धा डझन लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र उमेदवारी मिळण्यापूर्वीच ते बाद होतील, असे दिसते.या निवडणुकीत खा. सातव यांना टक्कर द्यायची झाल्यास विरोधकांना वेळीच उमेदवार ठरवावा लागणार आहे. मात्र वरिष्ठ स्तरावर युतीच्या चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. त्यातच जागा शिवसेनेची असताना भाजपाचीच मंडळी जोरात कामाला लागल्यासारखे दाखवत असल्याने शिवसेनाही संभ्रमात आहे. शिवसेनेने दावा मात्र सोडलेला नाही. युती नाही झाली तर तयारी असावी, यासाठी भाजपाच्या आखलेल्या व्यूहरचनेचा हा भाग असू शकेल. अन्यथा या इच्छुकांपैकी काही नाहकच अपक्ष वा बंडखोर म्हणून डोकेदुखी करायला मैदानात उतरण्याची भीती नाकारता येत नाही. मागच्या वेळी २२ उमेदवार रिंगणात होते. नामसाधर्म्य असलेल्या अनेकांना पक्षीय तिकिटावर उभे केले होते. अशांनीही मोठी मते खाल्ली. त्यामुळे अवघ्या १६३२ मतांनीच राजीव सातव विजयी झाले होते. जातीय समीकरणासाठीही काहींचा उपयोग घेतला जाऊ शकतो.सध्याची परिस्थितीमागच्या वेळी सेनेतील काहींनी काँग्रेसला मदत केली होती. त्यात बरीच फाटाफूट झाली. सेनाही बॅकफूटवर असून मागच्या लोकसभेपूर्वी वादाचे व सेनेच्या पराभवाचे कारण ठरलेल्या जि.प.त राकाँ-काँग्रेससोबतच सत्तेत आहे. गेल्या वेळी आपली हक्काची जागा काँग्रेसने हिसकावल्याची नाराजी राष्ट्रवादीतील काही मंडळीत होती. ती यंदा दिसत नाही.मतदारसंघाची रचना विचित्र आहे. यवतमाळ, नांदेड व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघात प्रचार करायचा झाल्यास पूर्वतयारी गरजेची आहे. आताही खासदार असणे ही सातव यांची ही जमेची बाजू. विरोधकांना चेहरा ठरत नसल्याने अडचण.मागच्यावेळीही काँग्रेसमध्ये शिवसेनेप्रमाणेच गटबाजी होती. मात्र ती कमी होती. आता ती वाढली. शिवाय इतरही पक्षांमध्ये याची काही कमी नाही. हा गोंधळ निवडणुकीवर कसा परिणाम करणारा ठरतो, यातच विजयाची गणिते सामावली आहेत.इतरत्र जोरदार चर्चा असलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीचे इकडे वारे नाही. तर ऐनवेळी काही पक्ष नशीब अजमावतात. कुणी बडा नेता गळाला न लागल्यास लढायची म्हणून निवडणूक लढणार, असे चित्र आहे.२०१४ मध्ये मिळालेली मते4,67,397राजीव सातव(काँग्रेस)4,65,765सुभाष वानखेडे(शिवसेना)25,145चुन्नीलाल मोहन जाधव(बसपा)14,986डी.बी. नाईक(माकप)6,126उत्तम पांडुरंग राठोड(बमुपा) 

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूकRajeev Satavराजीव सातव