शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मतदारसंघ, हिंगोली : युतीचा उमेदवारच निश्चित होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 05:56 IST

हिंगोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सध्याचे खा.राजीव सातव यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार कोण, हेच अद्याप नक्की नाही.

- विजय पाटील  हिंगोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सध्याचे खा.राजीव सातव यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार कोण, हेच अद्याप नक्की नाही. मुळात या दोन पक्षांत युती होईल, की ते स्वतंत्रपणे लढतील, हेही ठरलेले नाही. त्यामुळे भाजपा व शिवसेनेचे डझनभर इच्छुक मतदारसंघाची वारी करीत आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ही जागा घेऊन काँग्रेसने कळमनुरीचे तत्कालीन आ. राजीव सातव यांना मैदानात उतरविले होते. शिवसेनेचे खा. सुभाष वानखेडे यांच्याशी झालेल्या लढतीत मोदी लाटेतही महाराष्ट्रात टिकाव धरलेल्या काँग्रेसच्या दोघांपैकी खा. सातव हे एक होते.मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. युतीत ही जागा ज्या सेनेकडे जाईल, असे वाटते. त्यांच्याकडे प्रबळ चेहरा नाही. त्यामुळे काही दिवसांपासून वसमतचे सेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा यांनी प्रयत्न चालवले आहेत. उमरखेडचे माजी आ. प्रकाश पाटीलही अधूनमधून चेहरा दाखवत असतात. मात्र परभणीचे आ.राहुल पाटील, हदगावचे आ. नागेश पाटील आष्टीकर व नांदेडचे आ. हेमंत पाटील हेही मतदारसंघावर डोळा ठेवून आहे. युती झाल्यास भाजपाला ही जागा मिळेल की नाही, याची काहीच शाश्वती नाही. मात्र मागील लोकसभेनंतर तीन माजी खासदार भाजपात गेले. यात सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील व अ‍ॅड. शिवाजी माने यांचा समावेश होता. हे तिघेही लोकसभा उमेदवारीवर दावा करीत आहेत.यापैकी वानखेडे आता हदगाव विधानसभेकडेच लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. मात्र उर्वरित दोघांना लोकसभा उमेदवारीची आस आहे. या तिघांमध्येच तगडी स्पर्धा असताना भाजपा म्हणजे विजयाचे गणित असे समजून इतरही अर्धा डझन लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र उमेदवारी मिळण्यापूर्वीच ते बाद होतील, असे दिसते.या निवडणुकीत खा. सातव यांना टक्कर द्यायची झाल्यास विरोधकांना वेळीच उमेदवार ठरवावा लागणार आहे. मात्र वरिष्ठ स्तरावर युतीच्या चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. त्यातच जागा शिवसेनेची असताना भाजपाचीच मंडळी जोरात कामाला लागल्यासारखे दाखवत असल्याने शिवसेनाही संभ्रमात आहे. शिवसेनेने दावा मात्र सोडलेला नाही. युती नाही झाली तर तयारी असावी, यासाठी भाजपाच्या आखलेल्या व्यूहरचनेचा हा भाग असू शकेल. अन्यथा या इच्छुकांपैकी काही नाहकच अपक्ष वा बंडखोर म्हणून डोकेदुखी करायला मैदानात उतरण्याची भीती नाकारता येत नाही. मागच्या वेळी २२ उमेदवार रिंगणात होते. नामसाधर्म्य असलेल्या अनेकांना पक्षीय तिकिटावर उभे केले होते. अशांनीही मोठी मते खाल्ली. त्यामुळे अवघ्या १६३२ मतांनीच राजीव सातव विजयी झाले होते. जातीय समीकरणासाठीही काहींचा उपयोग घेतला जाऊ शकतो.सध्याची परिस्थितीमागच्या वेळी सेनेतील काहींनी काँग्रेसला मदत केली होती. त्यात बरीच फाटाफूट झाली. सेनाही बॅकफूटवर असून मागच्या लोकसभेपूर्वी वादाचे व सेनेच्या पराभवाचे कारण ठरलेल्या जि.प.त राकाँ-काँग्रेससोबतच सत्तेत आहे. गेल्या वेळी आपली हक्काची जागा काँग्रेसने हिसकावल्याची नाराजी राष्ट्रवादीतील काही मंडळीत होती. ती यंदा दिसत नाही.मतदारसंघाची रचना विचित्र आहे. यवतमाळ, नांदेड व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघात प्रचार करायचा झाल्यास पूर्वतयारी गरजेची आहे. आताही खासदार असणे ही सातव यांची ही जमेची बाजू. विरोधकांना चेहरा ठरत नसल्याने अडचण.मागच्यावेळीही काँग्रेसमध्ये शिवसेनेप्रमाणेच गटबाजी होती. मात्र ती कमी होती. आता ती वाढली. शिवाय इतरही पक्षांमध्ये याची काही कमी नाही. हा गोंधळ निवडणुकीवर कसा परिणाम करणारा ठरतो, यातच विजयाची गणिते सामावली आहेत.इतरत्र जोरदार चर्चा असलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीचे इकडे वारे नाही. तर ऐनवेळी काही पक्ष नशीब अजमावतात. कुणी बडा नेता गळाला न लागल्यास लढायची म्हणून निवडणूक लढणार, असे चित्र आहे.२०१४ मध्ये मिळालेली मते4,67,397राजीव सातव(काँग्रेस)4,65,765सुभाष वानखेडे(शिवसेना)25,145चुन्नीलाल मोहन जाधव(बसपा)14,986डी.बी. नाईक(माकप)6,126उत्तम पांडुरंग राठोड(बमुपा) 

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूकRajeev Satavराजीव सातव