शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मतदारसंघ, हिंगोली : युतीचा उमेदवारच निश्चित होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 05:56 IST

हिंगोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सध्याचे खा.राजीव सातव यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार कोण, हेच अद्याप नक्की नाही.

- विजय पाटील  हिंगोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सध्याचे खा.राजीव सातव यांच्यासमोर शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार कोण, हेच अद्याप नक्की नाही. मुळात या दोन पक्षांत युती होईल, की ते स्वतंत्रपणे लढतील, हेही ठरलेले नाही. त्यामुळे भाजपा व शिवसेनेचे डझनभर इच्छुक मतदारसंघाची वारी करीत आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ही जागा घेऊन काँग्रेसने कळमनुरीचे तत्कालीन आ. राजीव सातव यांना मैदानात उतरविले होते. शिवसेनेचे खा. सुभाष वानखेडे यांच्याशी झालेल्या लढतीत मोदी लाटेतही महाराष्ट्रात टिकाव धरलेल्या काँग्रेसच्या दोघांपैकी खा. सातव हे एक होते.मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. युतीत ही जागा ज्या सेनेकडे जाईल, असे वाटते. त्यांच्याकडे प्रबळ चेहरा नाही. त्यामुळे काही दिवसांपासून वसमतचे सेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा यांनी प्रयत्न चालवले आहेत. उमरखेडचे माजी आ. प्रकाश पाटीलही अधूनमधून चेहरा दाखवत असतात. मात्र परभणीचे आ.राहुल पाटील, हदगावचे आ. नागेश पाटील आष्टीकर व नांदेडचे आ. हेमंत पाटील हेही मतदारसंघावर डोळा ठेवून आहे. युती झाल्यास भाजपाला ही जागा मिळेल की नाही, याची काहीच शाश्वती नाही. मात्र मागील लोकसभेनंतर तीन माजी खासदार भाजपात गेले. यात सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील व अ‍ॅड. शिवाजी माने यांचा समावेश होता. हे तिघेही लोकसभा उमेदवारीवर दावा करीत आहेत.यापैकी वानखेडे आता हदगाव विधानसभेकडेच लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. मात्र उर्वरित दोघांना लोकसभा उमेदवारीची आस आहे. या तिघांमध्येच तगडी स्पर्धा असताना भाजपा म्हणजे विजयाचे गणित असे समजून इतरही अर्धा डझन लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र उमेदवारी मिळण्यापूर्वीच ते बाद होतील, असे दिसते.या निवडणुकीत खा. सातव यांना टक्कर द्यायची झाल्यास विरोधकांना वेळीच उमेदवार ठरवावा लागणार आहे. मात्र वरिष्ठ स्तरावर युतीच्या चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. त्यातच जागा शिवसेनेची असताना भाजपाचीच मंडळी जोरात कामाला लागल्यासारखे दाखवत असल्याने शिवसेनाही संभ्रमात आहे. शिवसेनेने दावा मात्र सोडलेला नाही. युती नाही झाली तर तयारी असावी, यासाठी भाजपाच्या आखलेल्या व्यूहरचनेचा हा भाग असू शकेल. अन्यथा या इच्छुकांपैकी काही नाहकच अपक्ष वा बंडखोर म्हणून डोकेदुखी करायला मैदानात उतरण्याची भीती नाकारता येत नाही. मागच्या वेळी २२ उमेदवार रिंगणात होते. नामसाधर्म्य असलेल्या अनेकांना पक्षीय तिकिटावर उभे केले होते. अशांनीही मोठी मते खाल्ली. त्यामुळे अवघ्या १६३२ मतांनीच राजीव सातव विजयी झाले होते. जातीय समीकरणासाठीही काहींचा उपयोग घेतला जाऊ शकतो.सध्याची परिस्थितीमागच्या वेळी सेनेतील काहींनी काँग्रेसला मदत केली होती. त्यात बरीच फाटाफूट झाली. सेनाही बॅकफूटवर असून मागच्या लोकसभेपूर्वी वादाचे व सेनेच्या पराभवाचे कारण ठरलेल्या जि.प.त राकाँ-काँग्रेससोबतच सत्तेत आहे. गेल्या वेळी आपली हक्काची जागा काँग्रेसने हिसकावल्याची नाराजी राष्ट्रवादीतील काही मंडळीत होती. ती यंदा दिसत नाही.मतदारसंघाची रचना विचित्र आहे. यवतमाळ, नांदेड व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघात प्रचार करायचा झाल्यास पूर्वतयारी गरजेची आहे. आताही खासदार असणे ही सातव यांची ही जमेची बाजू. विरोधकांना चेहरा ठरत नसल्याने अडचण.मागच्यावेळीही काँग्रेसमध्ये शिवसेनेप्रमाणेच गटबाजी होती. मात्र ती कमी होती. आता ती वाढली. शिवाय इतरही पक्षांमध्ये याची काही कमी नाही. हा गोंधळ निवडणुकीवर कसा परिणाम करणारा ठरतो, यातच विजयाची गणिते सामावली आहेत.इतरत्र जोरदार चर्चा असलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीचे इकडे वारे नाही. तर ऐनवेळी काही पक्ष नशीब अजमावतात. कुणी बडा नेता गळाला न लागल्यास लढायची म्हणून निवडणूक लढणार, असे चित्र आहे.२०१४ मध्ये मिळालेली मते4,67,397राजीव सातव(काँग्रेस)4,65,765सुभाष वानखेडे(शिवसेना)25,145चुन्नीलाल मोहन जाधव(बसपा)14,986डी.बी. नाईक(माकप)6,126उत्तम पांडुरंग राठोड(बमुपा) 

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूकRajeev Satavराजीव सातव