शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

दुष्काळाआड सहकार बंद पाडण्याचे षडयंत्र

By admin | Updated: September 3, 2015 00:47 IST

दुष्काळाआड सहकार व ऊस उत्पादक शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र युती सरकारकडून आखले जात असल्याची टीका राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी केली आहे

अहमदनगर : दुष्काळाआड सहकार व ऊस उत्पादक शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र युती सरकारकडून आखले जात असल्याची टीका राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी केली आहे. दुष्काळी भागात ऊस लागवडीवर बंदी तसेच गरज पडल्यास यंदा साखर कारखान्यांच्या गाळपावर निर्बंध घालण्याची शक्यता कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली आहे. त्यावर साखर उत्पादक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवारात उभ्या असलेल्या उसाचे काय करणार? त्या शेतकऱ्यांना सरकार मोबदला देणार आहे की, केवळ दुष्काळाआड सहकार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला संपविण्याचे षडयंत्र राबविले जात आहे, असा सवाल नागवडे यांनी केला. ते म्हणाले, की सरकारने आधी लोकांना पाणी आणि जनावरांना चारा पोहोचविण्याची व्यवस्था करावी. हंगामाला अद्याप अवकाश आहे. सरकार दुष्काळ योजना राबविण्यात अपयशी ठरत आहे. त्या मुद्द्यावरून राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ही नसती उठाठेव सुरू असल्याची टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)