शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

हे तर दलित - मराठा संघर्ष पेटविण्याचे षड्यंत्र - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 05:22 IST

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला शौर्यदिनाच्या द्विशतक महोत्सवानिमित्त अभिवादन करण्यासाठी जाणा-या दलित कार्यकर्त्यांवरील हल्ला हा दलित आणि मराठा संघर्ष पेटविण्याचा षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

मुंबई - भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला शौर्यदिनाच्या द्विशतक महोत्सवानिमित्त अभिवादन करण्यासाठी जाणा-या दलित कार्यकर्त्यांवरील हल्ला हा दलित आणि मराठा संघर्ष पेटविण्याचा षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.परिसरातील सवर्ण मराठा समाजाची ही कृती निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करतानाच दलित मराठा संघर्ष पेटविण्याचे षडयंत्र रोखण्यासाठी मराठा आणि दलितांनीही संयम राखत शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहनही आठवले यांनी केले आहे.भीमा कोरेगाव येथील सणसवाडी व परिसरात भीम अनुयायांवर हल्ला होत असल्याचे कळताच आठवले यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्वरित कारवाईची मागणी केली. वढू गाव येथे शूरवीर गोविंद गायकवाड यांच्या समाधीची काही अज्ञातांनी तोडफोड केली. त्याबद्दल येथे झालेला वाद मिटलेला असताना तो उकरून काढण्याचा प्रयत्न होत आहे. भीम अनुयायांवरील हल्ल्याप्रकरणी आठवले यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचेही आठवले यांनी सांगितले.चौकशीची मागणीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी केली आहे. शौर्य लढ्याला यंदा २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक येतील, याची कल्पना सरकारला होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे वातावरण तणावपूर्ण होते. तरीही पोलिसांनी पुरेशी सुरक्षाव्यवस्था न ठेवल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPuneपुणेMumbaiमुंबई