शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचे निलम गो-हे यांच्याकडून सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 20:02 IST

जानेवारी प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने, हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता

मुंबई : जानेवारी प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने, हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. या सदर कुटुंबाचं सांत्वन करण्याकरिता नीलमताई गोर्हे यांनीआज जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे जाऊन भेट घेतली व त्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने आधार दिला. यावेळी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील, हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, ग्रामस्थ विशाल सुर्यवंशी, पाटील कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावल व पाटील कुटुंबीय उपस्थित होते. मंत्रीमहोदय आणि पाटील कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना निलम हे ‌म्हणाल्या,"ऑक्टोबर २०१२ मध्ये केलेल्या पंचनाम्यानुसार भरपाई मिळावी अशी मागणी पाटील कुटुंबायांची आहे.

तत्कालीन सरकारकडून त्यांना  नुकसान भरपाई देण्यात आली होती ती बळजबरीने लादण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती पण त्याची दखल घेतली गेली नाही. हा भूसंपादन प्रस्ताव ७/२००९ क्र.असून ८/५/२००९ला प्रस्ताव दाखल झाला व तो  २६/२/२०१४ ला अंतीम अधीसूचना निघाली. विशेष म्हणजे महाजेनकोने खाजगी वाटाघाटीने घेतलेल्या जमिनी ६७५ हेक्टर ३२ आर, तर भूसंपादनामार्फत संपादित जमिनी १९९ हेक्टर २७ आर आहेत. महाजेनकोने खाजगी वाटाघाटीने जमिनी संपादित करतांना मनमानी कारभार करून शेतकर्यांशी संवेदनाहीन वर्तन केले म्हणून त्यांच्याही तत्कालीन अधिकार्यांच्या चौकशीची व त्यांच्यावर कारवाईची मागणी आ.डाँ.नीलम गोर्हे यांनी केली आहे.                               आज दि.२८ जाने २०१८ला जेजे हॉस्पिटल येथे सुधारित नुकसान भरपाईबाबत पहाणीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाटील कुटुंबियांना देण्यात आले आहे. असे असले तरी या व इतर ज्या ज्या शेतकर्यांच्या मोबदल्याबाबत तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारींचे निराकरण महसूल, ऊर्जा या विभागांनी करावे असेही आ.डाँ. नीलम गोर्हे यांनी सरकारला सुचविले आहे व अधीवेशनातही त्याचा पाठपुरावा करणार आहेत