शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

युतीची बोलणी बेकीकडे

By admin | Updated: January 20, 2017 00:01 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती व्हावी

यदु जोशी,

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती व्हावी, अशी फार इच्छा असल्याचे बोलले जात असले तरी दोन्ही नेत्यांवर युती न करण्याबाबत स्वपक्षीयांकडून वाढत असलेला दबाव आणि युती झाल्यास संभवणारी प्रचंड बंडखोरी लक्षात घेता वेगळे लढण्याकडेच आता वेगाने पाऊले पडत असून युती होण्याची शक्यता क्षणागणिक संपुष्टात येत आहे. भाजपाने युतीमध्ये २२७ पैकी ११४ जागा मागितल्या असून त्यात लालबाग, परळ, दादर, माटुंगा, माहीम, वरळी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील जागांही मागितल्याने सेनेच्या तंबूत अस्वस्थता आहे. ठाकरे यांनी आज पत्र परिषद घेऊन मुंबईसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर करीत भाजपावर कुरघोडी केली आणि एकप्रकारे स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले, असे म्हटले जात आहे. शिवसेनेने २२७ जागांची उमेदवार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. दुसरीकडे भाजपाच्या सांसदीय मंडळाची आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सर्व २२७ जागांसाठीची उमेदवार यादी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री पीयूष गोयल, शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार आदी उपस्थित होते. मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी तीन मतदारसंघांमधील उमेदवारांची यादी आज नक्की करण्यात आली, असे समजते. >दोन्ही पक्षांतील नेते, पदाधिकाऱ्यांची भूमिकायुती झाली तर प्रचंड बंडखोरी होईल. तसेच एकमेकांचे उमेदवार पाडापाडीचे प्रकार घडतील. युती झाली नाही तर आम शिवसैनिक त्वेषाने प्रचार करतील, युती झाली तर त्यांच्यात शैथिल्य येईल, असे मानणारा मोठा वर्ग शिवसेनेत आहे. युती झाली तर मनसेला ताकद मिळेल. मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गळाला सेना-भाजपाचे बंडखोर उमेदवार लागतील. युती झाली नाही तर दोन्ही पक्षांच्या जागा वाढतील.उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या आमच्या नेत्यांविरुद्ध वाट्टेल तशी टीका करणारे आशिष शेलार यांच्याबरोबर चर्चाच करू नका, असा आग्रह अनेक शिवसेना पदाधिकारी, शाखाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला आहे.भाजपाने शिवसेनेकडे ११४ जागा मागितल्या आहेत पण गेल्यावेळी भाजपाने लढलेल्या ६३ जागा, अधिक रिपाइंला देण्यात आलेल्या २८ जागा अशा एकूण ९३ जागा होतात. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत ८५ ते ९० पेक्षा जास्त जागा भाजपाला सोडू शकते. त्यातूनच रिपाइंला भाजपाने जागा द्याव्यात असे शिवसेनेचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले.शिवसेनेचे नेते, मुंबईतील पदाधिकारी, शाखाप्रमुख, नगरसेवक यापैकी कोणीही युती करावी, या मताचे नाही. फक्त शिवसेनेच्या तीनचार मंत्र्यांचा युतीसाठी आग्रह आहे. >तसे पहिलेच मुख्यमंत्री...राज्यात आपली सत्ता असली तरी मुंबईत मराठी माणसासाठी शिवसेनाच पाहिजे, असे आजवरच्या काँग्रेसच्या बहुतेक मुख्यमंत्र्यांना वाटायचे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला सहानुभूती मिळावी, अशी विधाने त्यांच्याकडून केली जात आणि त्याचा फायदा शिवसेनेला मिळत गेला. ‘मुंबई महापालिका निकालानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अस्तित्व संपेल’असे विधान गेल्या निवडणुकीत मतदानाला काहीच दिवस बाकी असताना तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आणि शिवसैनिक पेटून उठला होता. या संदर्भात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अशी शिवसेनानुकुल निश्चितच नाही. किंबहुना शिवसेनेला मागे सारत मुंबईत भाजपाची सत्ता आली तर ती त्यांना हवीच आहे. अशा परिस्थितीत भाजपाला १०० हून अधिक जागा देऊन युती करणे म्हणजे पायावर दगड मारून घेण्यासारखे राहील, असे मत शिवसेनेच्या एका नेत्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.युतीमध्ये भाजपाने मागितलेल्या ११४ जागांची यादी घेऊन मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तासभर चर्चा केली.या यादीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले. रात्रीपर्यंत ही यादी शिवसेनेला दिली जाणार आहे.