शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

विजयदुर्ग कोल्हापूरशी जोडणार

By admin | Updated: August 21, 2016 00:31 IST

सुरेश प्रभंूची घोषणा : आचिर्णे स्थानकाचे भूमिपूजन; सिंधुदुर्गमध्ये लवकरच पर्यटन बैठक

तळवडे (ता. सावंतवाडी) : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला विजयदुर्ग बंदराने जोडणार असून, याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. ते सावंतवाडी येथे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे तसेच आचिर्णे रेल्वे स्थानकाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गमध्ये लवकरच पर्यटनाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सभापती प्रमोद सावंत, मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, रेल्वे संचालक संजय गुप्ता, आयआरटीसीचे अध्यक्ष डॉ. ए. के. मनोचा, बिशप आॅल्विन बरॅटो, बाळासाहेब निकम, प्रभाकर सावंत, रूपेश राऊळ, आदी उपस्थित होते.मळगाव येथे रेल्वे हॉटेल बनविणार असून, त्याचा प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला आहे. याबाबत टाटा कंपनीशी चर्चा सुरू आहे. हे हॉटेलही लवकर बनविण्यात येईल, असे त्यांनी जाहीर करून, सिंधुदुर्गची प्रगती पर्यटनातूनच करावी लागेल, यासाठी लवकरच केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात देशातील पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाच्या लोकांना बोलाविण्यात येणार आहे, असेही मंत्री प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता, डॉ. ए. के. मनोचा, आदींची भाषणे झाली. बाळासाहेब निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आर्चिर्णे रेल्वे स्थानकाचे रिमोटद्वारे, तर सावंतवाडी टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन यावेळी पार पडले. (प्रतिनिधी)कोकण समृद्ध बनविण्याचे माझे स्वप्नकोकण रेल्वेमार्गावरचा जास्तीत जास्त विकास करण्यात येणार असून, पूर्वी जे झाले नाही, ते या पाच वर्षांत करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाही, याची काळजी कोकणचा सुपुत्र म्हणून मी घेणार आहे, असे सांगत जास्तीत जास्त विकास करून समृद्ध कोकण बनवायचा आहे. हे माझे स्वप्न असून, ते पूर्ण करणारच, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, मळगाव रेल्वे स्थानकात रेल्वे हॉटेल बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकार तीन कोटी रुपयांचा निधी देणार आहे. मात्र, रेल्वे संयुक्तरीत्या हा प्रकल्प करीत असेल, तर राज्य सरकार सर्व ती मदत करेल, असेही त्यांनी जाहीर केले.लवकरच सर्वेक्षण करणाररेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, यापूर्वी उद्घाटन झाले की दगड लपवावे लागत होते; पण आता परिस्थिती बदलली असून, उद्घाटन झालेले दगड जपून ठेवावे लागत आहेत. काळ बदलला असून, कामांना गती आली आहे. यापूर्वी कोल्हापूर वैभववाडीशी जोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता; पण आता कोल्हापूर विजयदुर्ग बंदराशी जोडण्यात येणार आहे. त्याचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे.बेळगाव-रेडी बंदर रेल्वेने जोडातत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी बेळगाव-सावंतवाडी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बेळगाव रेडी बंदराशी जोडले गेले तर आणखी जलदगतीने विकास होईल. या मार्गाचे लवकरात लवकर सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रभू यांच्याकडे यावेळी केली.