शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

मोदी यांना रोखणे हेच कॉंग्रेसचे टार्गेट :पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:47 IST

एकापाठोपाठ एक लोकशाही संस्था उध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना रोखणे हा आमच्या सर्व विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. यामध्ये पक्षीय मतभेद न आणता तडजोडीची भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी घेतली असल्याची वस्तुस्थिती माजी मुखयमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.

ठळक मुद्देमोदी यांना रोखणे हेच कॉंग्रेसचे टार्गेट :पृथ्वीराज चव्हाण‘लोकमत’ कोल्हापूर  कार्यालयामध्ये दिलखुलास गप्पा

कोल्हापूर  : एकापाठोपाठ एक लोकशाही संस्था उध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना रोखणे हा आमच्या सर्व विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. यामध्ये पक्षीय मतभेद न आणता तडजोडीची भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी घेतली असल्याची वस्तुस्थिती माजी मुखयमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.

चव्हाण यांनी शनिवारी दुपारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन देश आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत मनमोकळी चर्चा केली. संपादक वसंत भोसले यांनी स्वागत करून त्यांना विविध विषयांवर बोलते केले.देशपातळीवरील राजकारणाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हिंदी भाषिक पटट्यामध्ये भाजपने गेल्या लोकसभेवेळी २७३ पैकी २२३ जागा मिळवल्या होत्या. परंतू याच पटट्यात आता आमची युपीए आघाडी मजबूत झाली आहे. त्यामुळे येथे भाजपच्या १00 ते ११0 जागा कमी होणार आहेत.

कर्नाटकात त्यांच्या १७ जागा आहेत त्या ५/६ पर्यंत खाली येतील. पुर्व भारतातील ७ जागा त्यांना टिकवता येणार नाहीत. महाराष्ट्र आणि गोव्याच्या एकूण ५0 जागा आहेत. मात्र शिवसेनेबाबत युती होणार की नाही हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत इथले चित्र सांगणे अवघड आहे.उत्तर प्रदेशमध्ये जरी सप, बसप युती झाली असली आणि आम्हांला पाऊल मागे घ्यावे लागले असले तरी तेथील वरच्या वर्गातील मते ही आम्ही निवडणूक नाही लढवली तर भाजपकडेच जाणार. ती जावू नयेत यासाठी आम्ही तेथे स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले. उपव्यवस्थापक (मनुष्यबळ आणि प्रशासन) संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांच्यासह संपादकीय सहकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला.

आरएसएसला हात झटकता येणार नाहीतआरएसएसने मोदी यांना आणले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकणं सहज शक्य नाही याची जाणीव आरएसएसलाही झाली आहे. त्यामुळे चूक झाली हे तर आरएसएसने मान्य करावे किंवा मोदी जे करत आहेत ते बरोबर आहे असे जाहीर करावे. यापुढच्या काळात आम्हीच आरएसएसला याबाबत जाब विचारणार आहोत.

सांगलीतून मी लढणार नाहीसांगली लोकसभेसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू आहे असे समजले. मात्र माझा पूर्वीचा मतदारसंघ आता राहिलेला नाही. त्यामुळे माझ्या नावाच्या चर्चेत अर्थ नाही. मी तेथून निवडणूक लढवणार नाही.

महाराष्ट्रामध्ये दुष्टपणाने सरकार चालवलं जातंयमहाराष्ट्रामध्ये अतिशय दुष्टपणाने सरकार चालवलं जात असल्याचा आरोप यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यातही कोल्हापुरातून राज्याला एक देणगी मिळाली आहे. महसूल खात्यातील भ्रष्टाचार टोकाचा वाढला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरLokmatलोकमत