शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मोदी यांना रोखणे हेच कॉंग्रेसचे टार्गेट :पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:47 IST

एकापाठोपाठ एक लोकशाही संस्था उध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना रोखणे हा आमच्या सर्व विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. यामध्ये पक्षीय मतभेद न आणता तडजोडीची भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी घेतली असल्याची वस्तुस्थिती माजी मुखयमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.

ठळक मुद्देमोदी यांना रोखणे हेच कॉंग्रेसचे टार्गेट :पृथ्वीराज चव्हाण‘लोकमत’ कोल्हापूर  कार्यालयामध्ये दिलखुलास गप्पा

कोल्हापूर  : एकापाठोपाठ एक लोकशाही संस्था उध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना रोखणे हा आमच्या सर्व विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. यामध्ये पक्षीय मतभेद न आणता तडजोडीची भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी घेतली असल्याची वस्तुस्थिती माजी मुखयमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.

चव्हाण यांनी शनिवारी दुपारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन देश आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत मनमोकळी चर्चा केली. संपादक वसंत भोसले यांनी स्वागत करून त्यांना विविध विषयांवर बोलते केले.देशपातळीवरील राजकारणाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हिंदी भाषिक पटट्यामध्ये भाजपने गेल्या लोकसभेवेळी २७३ पैकी २२३ जागा मिळवल्या होत्या. परंतू याच पटट्यात आता आमची युपीए आघाडी मजबूत झाली आहे. त्यामुळे येथे भाजपच्या १00 ते ११0 जागा कमी होणार आहेत.

कर्नाटकात त्यांच्या १७ जागा आहेत त्या ५/६ पर्यंत खाली येतील. पुर्व भारतातील ७ जागा त्यांना टिकवता येणार नाहीत. महाराष्ट्र आणि गोव्याच्या एकूण ५0 जागा आहेत. मात्र शिवसेनेबाबत युती होणार की नाही हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत इथले चित्र सांगणे अवघड आहे.उत्तर प्रदेशमध्ये जरी सप, बसप युती झाली असली आणि आम्हांला पाऊल मागे घ्यावे लागले असले तरी तेथील वरच्या वर्गातील मते ही आम्ही निवडणूक नाही लढवली तर भाजपकडेच जाणार. ती जावू नयेत यासाठी आम्ही तेथे स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले. उपव्यवस्थापक (मनुष्यबळ आणि प्रशासन) संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांच्यासह संपादकीय सहकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला.

आरएसएसला हात झटकता येणार नाहीतआरएसएसने मोदी यांना आणले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकणं सहज शक्य नाही याची जाणीव आरएसएसलाही झाली आहे. त्यामुळे चूक झाली हे तर आरएसएसने मान्य करावे किंवा मोदी जे करत आहेत ते बरोबर आहे असे जाहीर करावे. यापुढच्या काळात आम्हीच आरएसएसला याबाबत जाब विचारणार आहोत.

सांगलीतून मी लढणार नाहीसांगली लोकसभेसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू आहे असे समजले. मात्र माझा पूर्वीचा मतदारसंघ आता राहिलेला नाही. त्यामुळे माझ्या नावाच्या चर्चेत अर्थ नाही. मी तेथून निवडणूक लढवणार नाही.

महाराष्ट्रामध्ये दुष्टपणाने सरकार चालवलं जातंयमहाराष्ट्रामध्ये अतिशय दुष्टपणाने सरकार चालवलं जात असल्याचा आरोप यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यातही कोल्हापुरातून राज्याला एक देणगी मिळाली आहे. महसूल खात्यातील भ्रष्टाचार टोकाचा वाढला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरLokmatलोकमत