शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सरकारविरुद्ध काँग्रेसचा विभागीय जनआक्रोश मेळावा - माणिकराव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 19:34 IST

भाजप सरकारच्या गत तीन वर्षांतील अपयशाच्या वाटचालीमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी, महिला तसेच सर्व क्षेत्रातील नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. हा रोष सरकारला दाखविण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी सांयन्सस्कोअर मैदानावर अमरावती विभागीय जनआक्रोश मेळावा काँग्रेसच्यावतीने आयोजित केल्याची

अमरावती -  भाजप सरकारच्या गत तीन वर्षांतील अपयशाच्या वाटचालीमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी, महिला तसेच सर्व क्षेत्रातील नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. हा रोष सरकारला दाखविण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी सांयन्सस्कोअर मैदानावर अमरावती विभागीय जनआक्रोश मेळावा काँग्रेसच्यावतीने आयोजित केल्याची माहिती विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी रविवारी येथे दिली.या मेळाव्याला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अन्य नेते उपस्थित राहतील, असे ठाकरे यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. केंद्रातील भाजप सरकारला सत्तेत येऊन ३१ आॅक्टोबर रोजी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या तीन वर्षांच्या कार्यकाळात भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. शेतमालाला अल्प भाव, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतकºयांची कर्जमाफीच्या नावावर केलेली फसवणूक, जीएसटीमुळे नाराज असलेला व्यापारी वर्ग भाजप सरकारच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करीत आहे. त्यामुळे जनसामान्यांना संकटातून सावरण्यासाठी विरोधी पक्ष काँग्रेसने ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकारविरुद्ध वाढलेला जनआक्रोश शासनदरबारी मांडण्यासाठी काँग्रेसने अमरावतीत विभागीय जनआक्रोश मेळावा घेण्याचे ठरविले आहे. या मेळाव्यात शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, कापसाला ७ हजार रूपये भाव, सोयाबीनला ५ हजार रूपये भाव व नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या शासनाकडे या मेळाव्यातून केल्या जाणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मेळाव्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, आ. वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, राहुल बोंद्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष किशोर बोरकर, श्याम उमाळकर, मदन भरगड, बंडू सावरबांधे, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, प्रकाश साबळे, नितीन गोंडाणे, केवलराम काळे व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस