शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

परभणीत काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष

By admin | Updated: April 21, 2017 20:27 IST

परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ३१ जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेसाठी पक्षाला केवळ दोन

ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. 21 - येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीत ३१ जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेसाठी पक्षाला केवळ दोन जागांची गरज आहे. निवडून आलेले दोन्ही  अपक्ष काँग्रेसचे बंडखोर असल्याने काँग्रेसच्या सत्ता स्थापनेतील अडसर दूर झाला आहे.
परभणी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात शुक्रवारी मतमोजणी झाली. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक म्हणजे ३१ उमेदवार निवडून आले असून त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ उमेदवार निवडून आले आहेत. मोठ्या ताकदीने प्रचारात उतरलेल्या शिवसेनेची मात्र वाहताहत झाली असून या पक्षाचे केवळ ६ सदस्य निवडून आले आहेत. गेल्यावेळी केवळ २ संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत चांगली  कामगिरी केली असून या पक्षाचे ८ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय शहरातील प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक १६ मध्ये प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार निवडून आला असून हे दोन्ही अपक्ष उमेदवार काँग्रेसचे बंडखोर आहेत. महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला दोन जागांची गरज असून हे दोन्ही अपक्ष बंडखोर काँग्रेसकडे येऊ शकतात. परंतु, काँग्रेसकडून सद्यस्थितीत तरी या अपक्षांशी संपर्क साधण्यात आलेला नाही. 
काँग्रेसची राष्ट्रवादीशी आघाडी होण्याची शक्यता
येथील महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ३० जागा मिळवून पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेच्या मदतीने महापौरपद मिळविले होते. परंतु, नंतरच्या अडीच वर्षात काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादीने महापौरपद तर काँग्रेसने उपमहापौरपद घेतले होते. यावर्षीच्या निवडणुकीत उलटी स्थिती आहे. यावेळी काँग्रेसने ३१ जागा मिळविल्या असून राष्ट्रवादी दुसºया क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर प्रचारात केलेले आरोप विसरुन राष्ट्रवादीला सोबत घेण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे माजी आ.सुरेश देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसभवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले व अपक्षांपेक्षा राष्ट्रवादीला सोबत घेऊन काँग्रेस मनपात सत्तेवर येऊ शकते, असे सांगितले. त्यामुळे मनपात पुन्हा एकदा काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे.  
दिग्गजांचा झाला पराभव
या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या महापौर संगिता वडकर यांचे पती राजेंद्र वडकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांचे बंधू शिवाजी भरोसे, भाजपाचे गटनेते दिलीपसिंह ठाकूर, शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे या दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. 
दोन मतांनी राष्ट्रवादीच्या दुधगावकर विजयी
शहरातील प्रभाग क्रमांक १० ड मध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये काट्याची लढत झाली. मतमोजणीत प्रारंभी राष्ट्रवादीच्या उमेदवार संगिता दुधगावकर व शिवसेनेच्या उमेदवार सुनिता सामाले यांना समसमान म्हणजे २४८८ मते मिळाली होती. त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती सामाले यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार दुधगावकर यांना  १ मत वाढून एकूण २४८९ मते मिळाली. तर शिवसेनेच्या श्रीमती सामाले यांना २४८७ मते मिळाली. या निवडणुकीत फक्त दोन मतांनी राष्ट्रवादीच्या संगिता दुधगावकर विजयी झाल्या. 
राष्ट्रवादीची गेली सत्ता
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष राहील, अशी चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अतिआत्मविश्वास नडला. या पक्षाचा राज्यस्तरावरील एकही नेता शहरात प्रचारासाठी आला नाही. शिवाय बाहेरील कोणत्याही नेत्याने शहरात जाहीर सभा घेतली नाही. परिणामी या पक्षाला मनपातील सत्ता कायम ठेवता आली नाही.