शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

“देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही टेरर नेते, त्यांचे किती काळ जमते ते पाहू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:26 IST

Devendra Fadnavis And Ajit Pawar: सध्याच्या राजकारणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली असून, आगामी काळात काँग्रेसच्या जागा वाढतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis And Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानकपणे बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात मतभेद असून, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आमदार, समर्थकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातच आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही टेरर नेते, त्यांचे किती काळ जमते ते पाहू, असे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मतदानाला जायची इच्छा राहिली नाही, अशी लोकांची भावना आहे. यावरुन राज्यातील राजकारण्यांना लाज वाटावी, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. विकासाच्या नावावर सरकार आणायचे आणि विकासकामे ठप्प पाडायची. सत्तेच्या मलिदेसाठी भांडायचे असा लज्जास्पद प्रकार जनता बघत आहे. अशा राजकारण्यांची कशी जिरवायची अशी संधीची वाट लोक बघत आहेत. अर्थ विभाग अजित पवारांकडे गेले तर ज्या कारणामुळे हे लोक सत्तेतून बाहेर पडले आणि तेच कारण घेऊन सत्तेच्या बाहेर पडतील का याची जनता वाट पाहत आहे, अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही टेरर नेते

देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार दोन्ही नेते टेरर आहेत, त्यांचे किती काळ जमते ते पाहू. त्यांना दोन-तीन मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा आहे. पुढचे कसे शांत होतील तेही पाहू. खरंतर ११५ लोकांना (भाजप) ३३ टक्के वाटा आणि ३५ वाल्यांनाही (राष्ट्रवादी काँग्रेस) ३३ टक्के वाटा, हे सत्तेचे समीकरण जुळवून सत्तेतून जेवढे मिळेल तेवढे आपल्या घशात घालण्याचे सुरु आहे, या शब्दांत वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला. 

डबे ठेऊ नका इंजिनच लावा

डबल इंजिन ठीक आहे. आता तिसरे इंजिन, पुन्हा कोणीतरी म्हणे चौथे इंजिन. डबे ठेऊ नका इंजिनच लावा. बिना डब्याचे इंजिन असलेले सरकार. ज्यात लोकांना स्थान नाही फक्त सत्तेमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्थान आणि चालवणाऱ्याची मजा, मागे पब्लिक नाही, डबे नाही अशी अवस्था या लोकांची झाली आहे, असा निशाणा वडेट्टीवार यांनी साधला. तसेच आमच्या पक्षात लोकसभेला जबाबदाऱ्या वाटून घेऊन काम करावं लागेल. महाराष्ट्रात पोषक वातावरण आहे. सर्वांच्या नजरा काँग्रेस पक्षाकडे आहे. काँग्रेसवर विश्वास आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राला काँग्रेसला मोठे यश मिळणार आहे, आमच्या जागा वाढणार आहे, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पूर्वी तीन पक्षांचे सरकार होते त्याला रिक्षा म्हणत होते. त्या रिक्षाने संकटावर मात करत अडीच वर्षे सरकार चालवले. आता यांच्या तीन चाकी रिक्षा म्हणायचे की घसरगाडी म्हणायचे? यांच्या तीन चाकातील पहिला टायर कधी पंचर होतो ते आता लोक बघणार आहे. सत्तेसाठी एवढा हावरटपणा महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही, जो आता महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस