शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रदेशाध्यक्षांनीच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 01:35 IST

१९९९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यसमितीने जाहीर केलेला आणि थेट सोनिया गांधी यांनी नक्की केलेल्या उमेदवाराचा एबी फाॅर्म गायब करण्याची खेळी झाली.

मुंबई : राजकारणात डावपेच आणि शहकाटशह चालूच असतात. निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराचा एबी फाॅर्म लांबविण्याच्या घटनाही समोर येत असतात. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यसमितीने जाहीर केलेला आणि थेट सोनिया गांधी यांनी नक्की केलेल्या उमेदवाराचा एबी फाॅर्म गायब करण्याची खेळी झाली. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीच सोमवारी विधान परिषदेत याचा खुलासा केला. तेही राजीव आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले गेलेल्या दिवंगत राम प्रधान यांचाच दाखला देत.दिवंगत राम प्रधान यांच्यासह विनायक पाटील आणि संदेश कोंडविलकर यांच्या निधनाबद्दल आज विधान परिषदेत शोक प्रस्ताव मांडला गेला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी आदरांजलीपर भाषणे केली. यावेळी बोलताना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी हा खुलासा केला. यासाठी राम प्रधान यांच्या ‘माय डेज् विथ राजीव अँड सोनिया’ या पुस्तकातील परिच्छेदच वाचून दाखविला. यात राम प्रधान म्हणतात, १९९९च्या सार्वत्रिक निवडणुका जसजशा जवळ आल्या तसे मी महाराष्ट्रात अधिक लक्ष्य केंद्रित केले. काँग्रेसच्या विधानसभा तिकीटवाटपात चार वेळा मला हस्तक्षेप करावा लागला. यातील दोन उमेदवार मुंबईतील तर पुणे आणि कोल्हापुरातील एक एक उमेदवार होता. लायक असलेल्या उमेदवारांनाच तिकीटवाटप व्हावे, असे सोनियांना कळवावे लागले. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी