शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

“ED केसेस, CBIचा ससेमिरा थांबवायचा असेल तर भाजप सरकार घालवले पाहिजे”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 18:52 IST

लोकसभेत पराभव झाला, तर मग विधानसभा निवडणूक होणार नाही. कारण, पुन्हा लोकशाही राहणार नाही, अशी माझी खात्री आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Prithviraj Chavan: देशभरातील अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अनेकविध कारवाया केल्या जात आहेत. विरोधकांकडून या कारवायांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे सरकार घालवले पाहिजे, असे म्हटले आहे. 

ईडीच्या केसेस, सीबीआयचा ससेमिरा किंवा अन्यायकारण निधीवाटप संपवायचे असेल, तर भाजपचे सरकार घालवले पाहिजे. त्याची सुरुवात लोकसभेपासून होईल. लोकसभेत पराभव झाला, तर विधानसभेत आव्हान राहणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना, जागावाटपावरून महाविकास आघाडीत अलबेल आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

भाजपच्या विरोधात एकास-एक उमेदवार उभे करू

इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस शरद पवार गटासह काही पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहोत. भाजपच्या विरोधात एकास-एक उमेदवार उभे करू. महाराष्ट्रात तिन्ही पक्ष जागावाटपासाठी एकत्र बसू. आपापल्या पक्षांची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करणार. त्यामुळे थोडी वादावादी होईल, असे सूचक विधानही पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

दरम्यान, ललित पाटील प्रकरणी बोलताना, तेलगी प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावे आली. नंतर ते प्रकरण दडपण्यात आले. तसेच, सत्तेतील सरकार हे प्रकरण दडपून टाकतील. कारण, यात काही मंत्र्यांचा संबंध असल्याचे बोलले जात आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण