शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Sachin Sawant : "कोश्यारीजींचा दोष कमी होता, संघाचे संस्कार, विचार आणि मोदी सरकारचा दबाव अधिक दोषी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 14:29 IST

Congress Sachin Sawant And Bhagat Singh Koshyari : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा घणाघात केला आहे.

भगतसिंह कोश्यारी  (Bhagat Singh Koshyari) यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. याच दरम्यान आता यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "कोश्यारीजींचा दोष कमी होता, संघाचे संस्कार, संघाचे विचार आणि मोदी सरकारचा दबाव अधिक दोषी होता" असं म्हणत टीका केली आहे. 

"एक अकेला सबपे भारी" म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा घणाघात केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यासोबतच कोश्यारीजींना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा!" असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

"गेल्या ९ वर्षांत देशातील अनेक राज्यांत मोदी सरकारने नेमलेल्या राज्यपालांप्रमाणेच भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द राज्यपाल पदाची प्रतिष्ठा प्रचंड कमी करणारी होती. तसा कोश्यारीजींचा दोष कमी होता, संघाचे संस्कार, संघाचे विचार आणि मोदी सरकारचा दबाव अधिक दोषी होता. अनेक राज्यपाल आले पण अशा पध्दतीने जनतेच्या तिरस्काराचे धनी कोणाला व्हावे लागले नाही. जनतेने नाकारून ही व कोश्यारीजींनी मागणी करुनही भाजपा त्यांना हटवत नव्हती हा महाराष्ट्राचा अनादर होता. "एक अकेला सबपे भारी" म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले"

"जनमताचा रेट्यासमोर अनेक हुकुमशाह्या कोलमडून पडल्या आहेत आणि जनतेचा रेटा वाढत चालला आहे हे लक्षात ठेवा. एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकार अनेक संविधानिक संस्थांचे व भाजपा नेत्यांचे नैतिक अधःपतन करवत आहे. येणाऱ्या राज्यपालांकडून अधिक अपेक्षा नाही. कोश्यारींचे पदावरून जाणे हे त्यांच्यासाठीही योग्य आहे. सातत्याने भाजपाच्या सांगण्यानुसार विरोधकांना छळणे व मर्यादा ओलांढण्याऐवजी आता ते स्वतःला नैतिक कामात गुंतवू शकतील. कोश्यारीजींना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा!" असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी