शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

“मोदींनी देश विकायला काढलाय, हे लोकांच्या लक्षात आलेय; ९ वर्षांत...”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:41 IST

Prithviraj Chavan on PM Modi Govt: देशातील १९ विरोधी पक्षांनी भाजपविरोधात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीला ते आता रोखू शकत नाहीत, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे.

Prithviraj Chavan on PM Modi Govt: केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून उत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे विरोधक मात्र या ९ वर्षातील कार्यकाळावरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

मीडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रात मोदी सरकार स्थापन होऊन आज नऊ वर्षे पूर्ण झाली. मात्र, या नऊ वर्षांत देशात महागाई, बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांना हमीभाव नाही. शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. अदानींना फायदा करून देण्यासाठी भ्रष्टाचार केला, करात वाढ करून देशाला लुटले, देशात सुविधा देण्यास मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

मोदींनी देश विकायला काढलाय, हे लोकांच्या लक्षात आलेय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू आता संपली आहे. १३५ लाख कोटी कर्ज काढून देशाला कर्जात लोटले. अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली. पंतप्रधान मोदींनी देश विकायला काढला, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून कर्नाटकमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आली. अचानक केलेल्या नोटबंदीमुळे देश बेरोजगारी आणि आर्थिक संकटात आला आहे, हे सांगायला आता त्यांना तोंड नाही. त्यामुळे आज नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना काँग्रेसकडून नऊ प्रश्‍न विचारले आहेत. त्याची त्यांनी उत्तरे द्यावीत, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

दरम्यान, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. देशातील सामाजिक ऐक्य आणि शांतता धोक्यात आली. लव्ह जिहाद आणि इतर धार्मिक प्रश्न जाणीवपूर्वक उपस्थित करून देशाची दिशा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच कर्नाटकमध्ये काँग्रेसचा एकहाती विजय झाला आहे. सर्व विभागांत त्यांना जनतेने नाकारले आहे. भाजपने कर्नाटकला धार्मिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता देशातील १९ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकाराने महाविकास आघाडीला ते आता रोखू शकत नाहीत, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार