शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Praniti Shinde: “ईडीचा गेम त्यांच्यावरच उलटणार, आमची तशी संस्कृती नाही”; प्रणिती शिंदेंची केंद्रावर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:15 IST

Praniti Shinde: काँग्रेसकाळात सिलेंडर ३५० झाले होते, तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या.आता आम्ही काय पाठवायचे, असा सवाल प्रणिती शिंदेंनी केला.

सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर निशाणा साधला. यानंतर आता सोलापूरमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनावेळी पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत ईडीचा गेम त्यांच्यावरच उलटणार असल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे. 

वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर-सोलापूरमध्ये करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है”, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

आमची तशी संस्कृती नाही

आता जे या पद्धतीने ईडीचा वापर करत आहेत, हाच गेम त्यांच्यावरच उलटणार आहे. आता तेच होताना देखील दिसत आहे. शेवटी या सगळ्या संस्था स्वायत्त आहेत. काँग्रेसने कधी त्यांचा वापर केलेला नाही. आमची तशी संस्कृती देखील नाही. कधी ना कधी ते उलटतेच, असे टीकास्त्र प्रणिती शिंदे यांनी सोडले. ईडी ठराविक गुन्ह्यांमध्येच तपास करते. त्यांनी तशाच प्रकारे निवडक गुन्ह्यांमध्ये तपास करायला हवा. पण आता कुणी छोटे काही केले तरी हे ईडी आणतात. परवा कोल्हापुरात चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्ही पेटीएमवर काही केले तरी ईडी येईल. म्हणजे यांनी हे सिद्ध केले आहे की ईडी त्यांच्यासाठीच काम करते आणि मागच्या दारात बसली आहे, असा टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला. 

दरम्यान, देशात महागाई सातत्याने वाढत आहे. पण मोदी सरकार ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. गोरगरिबांना छळणारे मुद्दे असताना मोदी सरकार आणि भाजप सरकार हे मुद्दे बाजूला ठेवून वेगळेच मुद्दे हाताळत आहे. जात-पात-धर्म यावरच अजेंडा जात आहे. काँग्रेसच्या काळात सिलेंडर ३५० झाले होते, तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी आमचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांना बांगड्या पाठवल्या होत्या. बांगड्या पाठवणे कमी असण्याचे प्रतीक नाही. त्यातून त्यांनी काय सिद्ध केले? आता १००० रुपये सिलेंडर झाले आहे. तर आता आम्ही त्यांना नेमके काय पाठवू, अशी खोचक विचारणाही प्रणिती शिंदे यांनी केली. 

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस