शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Praniti Shinde: “ईडीचा गेम त्यांच्यावरच उलटणार, आमची तशी संस्कृती नाही”; प्रणिती शिंदेंची केंद्रावर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 19:15 IST

Praniti Shinde: काँग्रेसकाळात सिलेंडर ३५० झाले होते, तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या.आता आम्ही काय पाठवायचे, असा सवाल प्रणिती शिंदेंनी केला.

सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर निशाणा साधला. यानंतर आता सोलापूरमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनावेळी पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत ईडीचा गेम त्यांच्यावरच उलटणार असल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे. 

वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर-सोलापूरमध्ये करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है”, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

आमची तशी संस्कृती नाही

आता जे या पद्धतीने ईडीचा वापर करत आहेत, हाच गेम त्यांच्यावरच उलटणार आहे. आता तेच होताना देखील दिसत आहे. शेवटी या सगळ्या संस्था स्वायत्त आहेत. काँग्रेसने कधी त्यांचा वापर केलेला नाही. आमची तशी संस्कृती देखील नाही. कधी ना कधी ते उलटतेच, असे टीकास्त्र प्रणिती शिंदे यांनी सोडले. ईडी ठराविक गुन्ह्यांमध्येच तपास करते. त्यांनी तशाच प्रकारे निवडक गुन्ह्यांमध्ये तपास करायला हवा. पण आता कुणी छोटे काही केले तरी हे ईडी आणतात. परवा कोल्हापुरात चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्ही पेटीएमवर काही केले तरी ईडी येईल. म्हणजे यांनी हे सिद्ध केले आहे की ईडी त्यांच्यासाठीच काम करते आणि मागच्या दारात बसली आहे, असा टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला. 

दरम्यान, देशात महागाई सातत्याने वाढत आहे. पण मोदी सरकार ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. गोरगरिबांना छळणारे मुद्दे असताना मोदी सरकार आणि भाजप सरकार हे मुद्दे बाजूला ठेवून वेगळेच मुद्दे हाताळत आहे. जात-पात-धर्म यावरच अजेंडा जात आहे. काँग्रेसच्या काळात सिलेंडर ३५० झाले होते, तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी आमचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांना बांगड्या पाठवल्या होत्या. बांगड्या पाठवणे कमी असण्याचे प्रतीक नाही. त्यातून त्यांनी काय सिद्ध केले? आता १००० रुपये सिलेंडर झाले आहे. तर आता आम्ही त्यांना नेमके काय पाठवू, अशी खोचक विचारणाही प्रणिती शिंदे यांनी केली. 

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस