शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीचे २०० जागांवर एकमत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 05:45 IST

१६ जुलै रोजी मुंबईत बैठक : उर्वरित जागांवर काढणार तोडगा

- अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास २०० जागांवर एकमत झाले आहे. पुढील चर्चा करण्यासाठी येत्या १६ जुलै रोजी मुंबईत दोन्ही पक्षनेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, तर राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची उपस्थिती असेल.

यासंदर्भात लोकमतशी बोलताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, बुधवारी आम्ही आमच्या नेत्यांची एक बैठक घेतली. त्यात विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा झाली. आमच्या े विद्यमान जागा व ज्या ठिकाणी आम्ही पराभूत झालो होतो पण आता जेथे आमची परिस्थिती चांगली आहे अशा आमच्या जवळपास १०० जागा आहेत.

तेवढ्याच जागा राष्ट्रवादीच्याही अंतिम होत आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ८८ जागांसाठी मित्रपक्षांशी काय बोलणी करायची यावरही १६ तारखेला चर्चा होईल, असेही चव्हाण म्हणाले. आमच्या मुलाखती घेण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे, पण आत्ताच काही बोलणे योग्य नाही, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. बहुजन वंचित आघाडी सोबत काही बोलणी झाली का? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद नाही. ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने यांनी वंचित आघाडीला रामराम ठोकला आहे. त्यांच्यातच एकवाक्यता दिसत नाही पण आमची चर्चेची पूर्ण तयारी आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा आपण राजीनामा दिला आहे, शिवाय आपल्याऐवजी दुसऱ्या कोणावर जबाबदारी द्या असेही आपण श्रेष्ठींना सांगितले आहे हे खरे आहे का? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, मी श्रेष्ठींना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य कोणाकडे द्या असे आग्रहपूर्वक सांगितले आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मी काम चालूच ठेवले आहे.

कर्नाटकमुळे प्रदेशाध्यक्षाची निवड रखडलीपक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे सरचिटणीस वेणूगोपाल हे दोन्ही नेते कर्नाटकात निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे तिथे अडकले आहेत. त्यामुळे राज्यातल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय रखडल्याचे सुत्रांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या नकारानंतर बाळासाहेब थोरात यांनी हे पद स्वीकारण्यास उशिर होत असल्याचे मत व्यक्त केल्याचे समजते. तर हर्षवर्धन पाटील यांनी पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस