शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

काँग्रेस-राष्ट्रवादीत बहिष्कारावरून फूट

By admin | Updated: December 15, 2014 03:44 IST

आमदारांच्या निलंबनावरून शुक्रवारी विधानसभेत एकत्र येत सभात्याग करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील कामकाजावरील बहिष्कारावरून फूट पडली आहे.

कमलेश वानखेडे, नागपूरआमदारांच्या निलंबनावरून शुक्रवारी विधानसभेत एकत्र येत सभात्याग करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील कामकाजावरील बहिष्कारावरून फूट पडली आहे. सोमवारी विधानसभेच्या कामकाजात भाग न घेता पायऱ्यांवर बसून सरकारचा ‘बीपी’ वाढविण्याचा बेत राष्ट्रवादीने आखला असताना काँग्रेसने मात्र सभागृहात बसून गारपीट व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष अधिवेशनात राज्यपालांची अवमानना केल्याच्या मुद्यावरून काँग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले होते. तर हिवाळी अधिवेशनात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. या वेळी निलंबनाचे घाव सोसणाऱ्या काँग्रेसनेही राष्ट्रवादीला साथ दिली व सभात्याग केला. सोमवारी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून सरकारवर दबाव निर्माण करायचा व आपल्या आमदारांचे निलंबन रद्द करून घ्यायचे, अशी रणनीती विरोधकांनी आखली होती. मात्र, काँग्रेसने वेगळी भूमिका घेतल्यामुळे आता या मुद्यावर राष्ट्रवादी एकटी पडली आहे. काँग्रेसचे पाच सदस्य निलंबित करण्यात आले तेव्हा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला पाठबळ मिळाले नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा एक सदस्य निलंबित झाले म्हणून राष्ट्रवादी घेईल तीच भूमिका काँग्रेसने कशासाठी घ्यावी, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. तर, सरकारचा कारभार एकतर्फी सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.