शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदारच ५० खोके घेतल्याचे मान्य करतात, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 14:17 IST

Maharashtra News: विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, पण घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जातेय, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यापासून शिंदे गटातील आमदार-खासदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. यावरून शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि भाजपचे समर्थक असलेल्या आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद टोकाला गेला. रवी राणा यांनी शब्द मागे घेतले असले तरी बच्चू कडू यांनी यावर अधिक प्रतिक्रिया दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे गटावर टीका केली असून, शिंदे गटातील आमदारच ५० खोके घेतल्याचे मान्य करतात, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार, अशी विचारणा नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. 

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी कॅगमार्फत करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार? तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना खाऊ देणार नाही, असे म्हणता, मात्र स्वतःच भ्रष्टाचार करतायत, त्याची चौकशी कोण करणार, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. 

खोके वाचवायला सुरक्षा व्यवस्था दिली जाते

शिंदे गटातील आमदार आणि खासदारांनी ५० खोके घेतले, हे त्यांचेच आमदार मान्य करतात. त्यामुळे खोके वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, आमच्याबरोबर जनता आहे. पण त्यांनी घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जाते, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

दरम्यान, गुजरातमध्ये पूल पडला त्यातील आकडा मोठा आहे. तो अजून वाढण्याची शक्यता आहे. आकडेवारी जी समोर येतेय, त्याहीपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये होते, तेथेही पूल पडला. हे अॅक्ट ऑफ गॉड नसून फ्रॉड आहे. तेच गुजरातमध्येही लागू होते. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील, असे नाना पटोले म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेEknath Shindeएकनाथ शिंदे