शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदारच ५० खोके घेतल्याचे मान्य करतात, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 14:17 IST

Maharashtra News: विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, पण घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जातेय, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यापासून शिंदे गटातील आमदार-खासदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. यावरून शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि भाजपचे समर्थक असलेल्या आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद टोकाला गेला. रवी राणा यांनी शब्द मागे घेतले असले तरी बच्चू कडू यांनी यावर अधिक प्रतिक्रिया दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे गटावर टीका केली असून, शिंदे गटातील आमदारच ५० खोके घेतल्याचे मान्य करतात, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार, अशी विचारणा नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. 

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी कॅगमार्फत करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार? तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना खाऊ देणार नाही, असे म्हणता, मात्र स्वतःच भ्रष्टाचार करतायत, त्याची चौकशी कोण करणार, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. 

खोके वाचवायला सुरक्षा व्यवस्था दिली जाते

शिंदे गटातील आमदार आणि खासदारांनी ५० खोके घेतले, हे त्यांचेच आमदार मान्य करतात. त्यामुळे खोके वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, आमच्याबरोबर जनता आहे. पण त्यांनी घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जाते, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

दरम्यान, गुजरातमध्ये पूल पडला त्यातील आकडा मोठा आहे. तो अजून वाढण्याची शक्यता आहे. आकडेवारी जी समोर येतेय, त्याहीपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये होते, तेथेही पूल पडला. हे अॅक्ट ऑफ गॉड नसून फ्रॉड आहे. तेच गुजरातमध्येही लागू होते. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील, असे नाना पटोले म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेEknath Shindeएकनाथ शिंदे