शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

“PM मोदींना खुश करायला पुतळ्याचे अनावरण, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत”: प्रणिती शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:03 IST

Congress MP Praniti Shinde: आता रस्त्यावर उतरून पेटून उठायची गरज आहे. जे लोकसभेला चित्र दिसले तेच विधानसभेत दिसणार आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.

Congress MP Praniti Shinde: मालवण सिंधुदुर्गातील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते मालवण येथे पाहणी करायला गेले होते. तेव्हा तिथे नारायण राणेही आले. यामुळे ठाकरे गट आणि राणे समर्थक यांमध्ये जोरदार राडा झाला. यावरून आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आपल्या राज्यात परवा जे घडले ते महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती. फक्त चरणच दिसत होते, अशा पद्धतीचे फोटो व्हायरल झाले. हे दृश्य अनेक जणांना बघवले नाही. अंगावर शहारा येत होता. महाराजांची मूर्ती ही एक जरी प्रतिमा जरी असली तरी त्या मागील या सरकारच्या भावना लक्षात येतात. पुतळ्याची विटंबना करण्यात आली. तो पुतळा कमकुवत होता, ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिले ते केवळ तुमच्या मुलाला खुश करण्यासाठी देण्यात आले. पंतप्रधानांना खुश करण्यासाठी तुम्ही त्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले, या शब्दांत प्रणिती शिंदे यांनी निशाणा साधला.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार नाही

नुसते शो बाजी करणारे सरकार आहे. आतून अतिशय पोकळ असे हे सरकार आहे. आतून पोकळ असणारा पुतळा तयार केला. अरबी समुद्रात मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे प्रस्तावित आहे. पण हे सरकार तो पुतळा करणार नाही. मात्र, जो पुतळा आहे, त्याची अशा पद्धतीने विटंबना करता. हवेमुळे पुतळा पडला असे वक्तव्य जर मुख्यमंत्र्यांकडून होत असेल तर जनतेने कोणाकडे पाहायचे, अशी विचारणा प्रणिती शिंदे यांनी केली. 

जे लोकसभेला चित्र दिसले तेच आता विधानसभेत दिसणार आहे

बदलपूरच्या घटनेमागे हेच लोक राजकारण करत आहे. पुतळा पडण्यामागे हवेचे कारण त्यांच्याकडून दिले जात आहे. या पद्धतीच त्यांचे बोलणे असेल तर एकंदरीत हे दिसून येत की, त्यांची उलटी गिनती सुरु झाली आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नाहीत. ते अगोदर आतमधून, अनऑफिशिअली पैसे द्यायचे आता ऑफिशिअली देत आहेत. म्हणून ते आणखी एक महिना मागत आहेत. निवडणुका जाहीर करत नाहीत. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत. राज्याच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. कारण अजून त्यांना पैसे वाटप करायचे आहेत. आता रस्त्यावर उतरून पेटून उठायची गरज आहे. जे लोकसभेला चित्र दिसले तेच विधानसभेत दिसणार आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.  

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजcongressकाँग्रेस