शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

…तर आमदारकीचा राजीनामा देईन; ‘मविआ’ सरकारवर काँग्रेस आमदाराची जाहीर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 19:03 IST

महाविकास आघाडीत एका काँग्रेस आमदाराची खदखद बाहेर आली आहे. काँग्रेसच्या आमदाराने स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मुंबई – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र काही ना काही कारणांवरून मविआत धुसफूस असल्याचं समोर येते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनीच उद्धव ठाकरेंची भेट घेत अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याची भाषा करत नाराजी व्यक्त केली. सरकारमध्ये निधी वाटपावरून काँग्रेस-शिवसेनेचे आमदार सातत्याने नाराजी करत आहेत. त्यातच एका काँग्रेस आमदाराने आता राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

महाविकास आघाडीत एका काँग्रेस आमदाराची खदखद बाहेर आली आहे. काँग्रेसच्या आमदाराने स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आदिवासींची कामे होणार नसतील तर राजीनामा देऊन टाकील. राज्यातील आदिवासी विभागाची कामचं होत नसतील तर आमदारकीचा उपयोग काय असा सवाल करत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, आदिवासी विकास भवन येथे पोषण आहार आणि गणवेशासह इतर सुविधांचा अभाव असल्यानं शाळकरी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आंदोलन केलंय. राज्यातील आदिवासी आश्रम शाळेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत महिनाभरात कारवाई झाली नाहीतर प्रधान सचिव आणि आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करेल असं विधान केले आहे.

अलीकडेच काँग्रेसच्या १८ आमदारांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत आमदारांनी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राहुल गांधी हेच कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील आमदारांशी भेटीसाठी इच्छुक आहेत, लवकरच ते आमदारांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकूण घेणार असल्याचे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांना मिळत असलेल्या एकूणच वागणुकीबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

का आहेत काँग्रेस आमदार नाराज?

बडे नेते मंत्रिपदात खूश आहेत. आमदारांकडे कुणाचेच लक्ष नाही. महामंडळांवर आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेची अडचण असेल, तर किमान काँग्रेसच्या कोट्यात येणारी महामंडळे जाहीर करावी, अशी मागणी आमदारांनी केली. निधीचे सम प्रमाणात वाटप करावे व विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकाली काढावा, अशी मागणी काँग्रेस आमदारांची आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी