शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

…तर आमदारकीचा राजीनामा देईन; ‘मविआ’ सरकारवर काँग्रेस आमदाराची जाहीर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 19:03 IST

महाविकास आघाडीत एका काँग्रेस आमदाराची खदखद बाहेर आली आहे. काँग्रेसच्या आमदाराने स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मुंबई – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र काही ना काही कारणांवरून मविआत धुसफूस असल्याचं समोर येते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनीच उद्धव ठाकरेंची भेट घेत अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याची भाषा करत नाराजी व्यक्त केली. सरकारमध्ये निधी वाटपावरून काँग्रेस-शिवसेनेचे आमदार सातत्याने नाराजी करत आहेत. त्यातच एका काँग्रेस आमदाराने आता राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

महाविकास आघाडीत एका काँग्रेस आमदाराची खदखद बाहेर आली आहे. काँग्रेसच्या आमदाराने स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आदिवासींची कामे होणार नसतील तर राजीनामा देऊन टाकील. राज्यातील आदिवासी विभागाची कामचं होत नसतील तर आमदारकीचा उपयोग काय असा सवाल करत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, आदिवासी विकास भवन येथे पोषण आहार आणि गणवेशासह इतर सुविधांचा अभाव असल्यानं शाळकरी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आंदोलन केलंय. राज्यातील आदिवासी आश्रम शाळेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत महिनाभरात कारवाई झाली नाहीतर प्रधान सचिव आणि आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करेल असं विधान केले आहे.

अलीकडेच काँग्रेसच्या १८ आमदारांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत आमदारांनी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राहुल गांधी हेच कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील आमदारांशी भेटीसाठी इच्छुक आहेत, लवकरच ते आमदारांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे म्हणणे एकूण घेणार असल्याचे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांना मिळत असलेल्या एकूणच वागणुकीबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

का आहेत काँग्रेस आमदार नाराज?

बडे नेते मंत्रिपदात खूश आहेत. आमदारांकडे कुणाचेच लक्ष नाही. महामंडळांवर आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेची अडचण असेल, तर किमान काँग्रेसच्या कोट्यात येणारी महामंडळे जाहीर करावी, अशी मागणी आमदारांनी केली. निधीचे सम प्रमाणात वाटप करावे व विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकाली काढावा, अशी मागणी काँग्रेस आमदारांची आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी