शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

विधान परिषदेचे गड काँग्रेसने राखले

By admin | Updated: December 31, 2015 04:25 IST

‘लक्ष्मी’ दर्शनाच्या चर्चेने गाजलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने मुंबईसह कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार अशा तीन जागा जिंकून बाजी मारली. तर भाजपा, शिवसेनेने प्रत्येकी दोन

मुंबई : ‘लक्ष्मी’ दर्शनाच्या चर्चेने गाजलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने मुंबईसह कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार अशा तीन जागा जिंकून बाजी मारली. तर भाजपा, शिवसेनेने प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. सोलापुरात विद्यमान आमदार दीपक साळुंखे यांचा अनपेक्षित पराभव करून भाजपा पुरस्कृत प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीला जबर धक्का दिला. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची एक-एक जागा कमी झाली. विधान परिषदेच्या सात जागांसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. नागपूरची जागा यापूर्वीच बिनविरोध निघाली असून तेथे भाजपाचे गिरीश व्यास निवडून आले. उर्वरित सात जागांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईतील दुसऱ्या जागेवर काँग्रेसचे भाई जगताप अवघ्या तीन मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड ५५ तर जगताप यांना ५८ मते मिळाली. निकालानंतर लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानल्याने भाजपाची त्यांना आतून साथ होती हे स्पष्ट झाले. शिवसेनेकडे मतांचा पुरेसा कोटा असल्याने रामदास कदम पहिल्याच फेरीत विजयी झाले. मात्र निकालानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सूर आळवला. शिवसेनेने आपल्याकडील अतिरिक्त मते लाड यांच्या पारड्यात न टाकता कदमांचे संख्याबळ वाढविण्यावर भर देत लाड यांना जिंकवण्याच्या भाजपाच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. कोल्हापुरात भाजपा पुरस्कृत महादेवराव महाडिक विरुद्ध काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात झालेल्या संघर्षपूर्ण लढतीत अखेर पाटील यांनी बाजी मारली. सोलापुरात मोठा उलटफेर झाला. भाजपा पुरस्कृत अपक्ष प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार दीपक साळुंखे यांचा दारुण पराभव करत सर्वांनाच चकमा दिला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा सोलापुरी झटका मानला जातो. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादीने काँग्रेसला फक्त कोल्हापुरात साथ दिल्याचे दिसून येते. तर मुंबईत राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांनी केलेली बंडखोरी सोलापुरात राष्ट्रवादीला महागात पडली. काँग्रेसची मते परिचारकांकडे फिरली. धुळे-नंदुरबारमध्ये भाजपाला फक्त ३१ मते मिळाल्याने नाचक्की झाली. काँग्रेसचे अमरीशभाई पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला. अकोल्याची जागा शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांनी राखून हॅट्ट्रिक साधली. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे अरुण जगताप यांचा ६६ मतांनी विजय झाला. नागपुरात भाजपाचे गिरीश व्यास याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)मुंबई रामदास कदम (शिवसेना) ८६भाई जगताप (काँग्रेस) ५८प्रसाद लाड (अपक्ष) ५५(रामदास कदम आणि भाई जगताप विजयी)कोल्हापूर सतेज पाटील (काँग्रेस) २२०महादेवराव महाडिक (भाजपा पुरस्कृत अपक्ष) १५७अवैध मते ०५(सतेज पाटील ६३ मतांनी विजयी)अहमदनगर अरुण जगताप (राष्ट्रवादी) २४३प्रा. शशिकांत गाडे (शिवसेना) १७७जयंत ससाणे ०१अवैध मते ०७(अरुण जगताप ६६ मतांनी विजयी)सोलापूर प्रशांत परिचारक (भाजपा पुरस्कृत अपक्ष) २६१दीपक साळुंखे (राष्ट्रवादी) १२०अवैध १५(प्रशांत परिचारक १४१ मतांनी विजयी)अकोला गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना)५१३रवींद्र सपकाळ (राष्ट्रवादी) २३९अवैध मते २९नोटा ०५(गोपीकिशन बाजोरिया २७४ मतांनी विजयी)धुळे-नंदुरबारअमरीश पटेल (काँग्रेस)३५२डॉ. शशिकांत वाणी (भाजपा)३१अवैध मते०७नोटा०२(अमरीश पटेल ३२१ मतांनी विजयी)