शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

काँग्रेस नेते कोमात; इच्छुक उमेदवार जोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 14:03 IST

वंचित सोबत आघाडी बाबतचा निर्णय वरून काँग्रेसनेते संभ्रमात आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसला आलेल्या अपयशामुळे आणि राहुल गांधींनी दिलेल्या राजीनाम्याच्या मुद्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये मोठ्याप्रमाणात नैराश्य पहायला मिळत आहे. तर अनेकांनी पराभवाची नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामे सुद्धा दिले आहेत. मात्र असे असतानाही विधानसभा निवडणूकासाठी इच्छुक असलेले उमेदवार मात्र आपल्या मतदारसंघात कामाला लागले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते कोमात, इच्छुक उमेदवार जोमात असे म्हणण्याची वेळ आली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अवघ्या ५२ जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे पराभवाची जवाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला .  राजीनामा परत घ्यावा यासाठी काँग्रेसमधील जेष्ठ नेत्यांनी राहुल यांना साकड घातलं. मात्र राहुल आपल्या निर्णयावर ठाम असल्याने, काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना सुद्धा नेत्यांमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून, पुढे काय ? यावर नेतेमंडळी अडकून बसले आहेत. तर दुसरीकडे मात्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुकांनी पक्षाचे निर्णय होईल तेव्हा होईल, पण त्याआधीच आपला मतदारसंघ पिंजून काढणे सुरु केले आहेत.

वंचित सोबत आघाडी बाबतचा निर्णय वरून काँग्रेसनेते संभ्रमात आहेत. त्यातच काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये आलेली नैराश्य यामुळे पक्षाचे महत्वाचे नेते चिंतेत आहेत. विधनासभा मतदारसंघात मात्र स्वतःला भावी आमदार म्हणणारे काँग्रेसनेते कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी सोशल मिडियावर आपणच उमेदवार असणार असल्याचे प्रचार सुद्धा सुरु केला आहे. तर काही ठिकाणी  आंदोलन करून लोकांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार जोमात असल्याचे पहायला मिळत आहे.

 

अनिल पटेल ( काँग्रेस जिल्हाध्यक्ष औरंगाबाद )

लोकसभेचा निकाल काय आला हे आता सगळ्यांनाच  माहित आहे. परंतु विधानसभेचा विचार केला तर, कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक उमदेवार यांच्यात कुठेच नैराश्या जाणवत नाही. अनेक ठिकाणी निदर्शने आणि धरणे झालीत त्यात मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांचा सहभाग पहायला मिळाला. इच्छुकांनी सुद्धा जोरात काम सुरु केले आहेत.