शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर भगतसिंह कोश्यारींचे वागणे बदलले, राज्यपालपदाची गरिमा नष्ट केली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 19:12 IST

Maharashtra Politics: राज्यपालांवर कोणी टीका करत नाहीत. आक्षेप घेत नाहीत. मात्र, कोश्यारी त्याला अपवाद ठरले, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली.

Maharashtra Politics: भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावर भाष्य करताना भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची गरिमा नष्ट केली. तरीही १५ महिने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यास टाळाटाळ केली. त्याचे उत्तर केंद्र सरकारला द्यावे लागणार आहे. राज्यपाल कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली आहे. त्यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना परत बोलवावे असे महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न झाले. राज्यपाल पद हे संविधानिक पद आहे. आता त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. सरकारच्या कामात हस्तक्षेप करणे अपेक्षित नाही. मात्र, कोश्यारी स्वतः मुख्यमंत्री होते. त्यामुळे ते सक्रिय राजकारणातून बाहेर जाऊ शकले नाहीत, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.

शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर भगतसिंह कोश्यारींचे वागणे बदलले

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांचे वागणे अत्यंत वादग्रस्त ठरले. सतत आपण न्यूजमध्ये राहिले पाहिजे. चर्चेत राहिले पाहिजे, असा त्यांचा हट्ट होता. त्यामुळे राज्यपाल पदाची गरिमा त्यांनी नष्ट केली, असे म्हणावे लागेल, अशी टीका चव्हाण यांनी केली. 

दरम्यान, महाराष्ट्रात आल्यावरही वेगवेगळी विसंगत वक्तव्ये करत स्वतःवर आक्षेप ओढवून घेतले. कारण, नसताना बेजबाबदार वक्तव्येही सातत्याने केली. तसे पाहिले तर राज्यपालांवर कोणी टीका टिप्पणी करत नाहीत. आक्षेप घेत नाहीत. मात्र, कोश्यारी त्याला अपवाद ठरले. आमदारांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणली. तेही त्यांचा राजीनामा मागण्याचा महत्वाचे आक्षेपाचे कारण होते, असे चव्हाण यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी