शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर भगतसिंह कोश्यारींचे वागणे बदलले, राज्यपालपदाची गरिमा नष्ट केली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 19:12 IST

Maharashtra Politics: राज्यपालांवर कोणी टीका करत नाहीत. आक्षेप घेत नाहीत. मात्र, कोश्यारी त्याला अपवाद ठरले, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली.

Maharashtra Politics: भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावर भाष्य करताना भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची गरिमा नष्ट केली. तरीही १५ महिने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यास टाळाटाळ केली. त्याचे उत्तर केंद्र सरकारला द्यावे लागणार आहे. राज्यपाल कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली आहे. त्यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना परत बोलवावे असे महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न झाले. राज्यपाल पद हे संविधानिक पद आहे. आता त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. सरकारच्या कामात हस्तक्षेप करणे अपेक्षित नाही. मात्र, कोश्यारी स्वतः मुख्यमंत्री होते. त्यामुळे ते सक्रिय राजकारणातून बाहेर जाऊ शकले नाहीत, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.

शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यावर भगतसिंह कोश्यारींचे वागणे बदलले

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांचे वागणे अत्यंत वादग्रस्त ठरले. सतत आपण न्यूजमध्ये राहिले पाहिजे. चर्चेत राहिले पाहिजे, असा त्यांचा हट्ट होता. त्यामुळे राज्यपाल पदाची गरिमा त्यांनी नष्ट केली, असे म्हणावे लागेल, अशी टीका चव्हाण यांनी केली. 

दरम्यान, महाराष्ट्रात आल्यावरही वेगवेगळी विसंगत वक्तव्ये करत स्वतःवर आक्षेप ओढवून घेतले. कारण, नसताना बेजबाबदार वक्तव्येही सातत्याने केली. तसे पाहिले तर राज्यपालांवर कोणी टीका टिप्पणी करत नाहीत. आक्षेप घेत नाहीत. मात्र, कोश्यारी त्याला अपवाद ठरले. आमदारांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणली. तेही त्यांचा राजीनामा मागण्याचा महत्वाचे आक्षेपाचे कारण होते, असे चव्हाण यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी