शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

Maharashtra Politics: “भाजप अशी अवस्था करेल की आता थेट चारधाम यात्रेला जावे लागेल”; काँग्रेसचा शिंदे गटाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 09:56 IST

Maharashtra Politics: शिंदे गटाचे २२ आमदार कुठे जाणार हे आधी पाहिले पाहिजे. मुंबई महापालिकेची निवडणूक फार लांबची गोष्ट आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळून नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन साडेतीन महिन्यांचा काळ लोटला आहे. या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात अनेक मंडळांना, कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या. आता बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच काँग्रेस खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत, भाजप अशी अवस्था करून ठेवली आहे की, त्यांना थेट चारधाम यात्रेला जावे लागेल, असा टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्यासाठी आमंत्रण दिले होते. महंतांचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे अयोध्येला जाण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसली तरी, एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदारही अयोध्येला जाणार आहेत. यावरून काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी टीका केली आहे. 

येत्या काही दिवसांमध्ये त्यांना थेट चारधामच्या यात्रेला निघून जावे लागेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याबाबत इम्रान प्रतापगढी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, भारतीय जनता पक्षाने त्यांची अशी अवस्था करून ठेवली आहे की, येत्या काही दिवसांमध्ये त्यांना थेट चारधामच्या यात्रेला निघून जावे लागेल, असा टोला प्रतापगढी यांनी यावेळी लगावला. मुंबई महानगपालिका निवडणुकांवर भाष्य करताना, आम्ही मुंबईत पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असे ते म्हणतात. मात्र, आधी हे पाहिले पाहिजे की सध्याच्या सरकारमधले २२ आमदार कुठे जाणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका तर फार लांबची बाब आहे, अशी टीकाही प्रतापगढी यांनी केली आहे. 

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शेतकरी आणि जनतेतील सरकारबाबतचा रोष दिसून येत आहे. राज्यातील खरा मुख्यमंत्री कोण असा सवालही विचारण्यात येत आहे. यावरून काँग्रेस खासदार प्रतापगढी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेस