शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “भाजप अशी अवस्था करेल की आता थेट चारधाम यात्रेला जावे लागेल”; काँग्रेसचा शिंदे गटाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 09:56 IST

Maharashtra Politics: शिंदे गटाचे २२ आमदार कुठे जाणार हे आधी पाहिले पाहिजे. मुंबई महापालिकेची निवडणूक फार लांबची गोष्ट आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळून नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन साडेतीन महिन्यांचा काळ लोटला आहे. या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात अनेक मंडळांना, कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या. आता बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच काँग्रेस खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत, भाजप अशी अवस्था करून ठेवली आहे की, त्यांना थेट चारधाम यात्रेला जावे लागेल, असा टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्यासाठी आमंत्रण दिले होते. महंतांचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे अयोध्येला जाण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसली तरी, एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदारही अयोध्येला जाणार आहेत. यावरून काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी टीका केली आहे. 

येत्या काही दिवसांमध्ये त्यांना थेट चारधामच्या यात्रेला निघून जावे लागेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याबाबत इम्रान प्रतापगढी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, भारतीय जनता पक्षाने त्यांची अशी अवस्था करून ठेवली आहे की, येत्या काही दिवसांमध्ये त्यांना थेट चारधामच्या यात्रेला निघून जावे लागेल, असा टोला प्रतापगढी यांनी यावेळी लगावला. मुंबई महानगपालिका निवडणुकांवर भाष्य करताना, आम्ही मुंबईत पूर्ण ताकदीने लढणार आहोत, असे ते म्हणतात. मात्र, आधी हे पाहिले पाहिजे की सध्याच्या सरकारमधले २२ आमदार कुठे जाणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका तर फार लांबची बाब आहे, अशी टीकाही प्रतापगढी यांनी केली आहे. 

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शेतकरी आणि जनतेतील सरकारबाबतचा रोष दिसून येत आहे. राज्यातील खरा मुख्यमंत्री कोण असा सवालही विचारण्यात येत आहे. यावरून काँग्रेस खासदार प्रतापगढी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेस