शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

काँग्रेसचा लढा देश वाचविण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:53 IST

मोदी सरकारने संरक्षणमंत्र्यांना विश्वासात न घेता राफेल विमानांचा सौदा केला.

नांदेड : आज देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु याला कोणीही बळी पडू नये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेहमी राष्ट्र उभारणीसाठी सजग राहावे. कारण काँग्रेसचा लढा हा सत्ता मिळविण्यासाठी नसून देश वाचविण्यासाठी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केले.नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी येथे मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबिर झाले. राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. राजीव सातव, खा. कुमार केतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.मोहन प्रकाश म्हणाले, इंग्रजांची गुलामी करणारे आज सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे महत्त्व वाटत नाही. काँग्रेसने स्वातंत्र्याची मूल्ये जोपासली. परंतु आज जातीमध्ये द्वेष पसरविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. आज इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाचा काळ नसून ‘माऊथ मीडिया’चा आहे. हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन शासनाच्या फसव्या योजनांबाबत नागरिकांशी सातत्याने चर्चा करावी.मोदी सरकारने संरक्षणमंत्र्यांना विश्वासात न घेता राफेल विमानांचा सौदा केला. या विमान खरेदीमध्ये ३६ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. तर कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. हा प्रकल्प सौदी अरेबियाला सोबत घेऊन केला जाणार आहे. आज सौदीमध्ये सर्व अभियंते पाकिस्तान येथील असून ते भारतात येणार नाहीत कशावरून, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट म्हणाले, लोकांना भावनिक बनवून आणि खोटी आश्वासने देऊन सत्तेत येता येते. परंतु सरकार चालविणे अवघड आहे. नरेंद्र मोदी यांनीदेखील लोकांना भावनिक करून सत्ता मिळविली. परंतु ते सरकार चालविण्यात अपयशी ठरले आहेत. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणाºया भाजपाचा २०१९च्या निवडणुकांमध्ये पराभव अटळ आहे, असे मत खा. कुमार केतकर यांनी व्यक्त केले.‘सर्व घोषणा कागदोपत्री’शासनाने सर्व घटकांच्या हातावर तुरी देण्याचे काम केले असून शेतकºयांना नुसतीच आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचे धोरण आखले जात आहे. एकीकडे शेतकरी बोंडअळी, कर्जमाफी, गारपीट, दुष्काळ यामुळे त्रस्त असताना शासनाने अनेक घोषणा केल्या; परंतु त्या कागदोपत्री असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेस