शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

काँग्रेसचा लढा देश वाचविण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:53 IST

मोदी सरकारने संरक्षणमंत्र्यांना विश्वासात न घेता राफेल विमानांचा सौदा केला.

नांदेड : आज देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु याला कोणीही बळी पडू नये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेहमी राष्ट्र उभारणीसाठी सजग राहावे. कारण काँग्रेसचा लढा हा सत्ता मिळविण्यासाठी नसून देश वाचविण्यासाठी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केले.नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी येथे मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबिर झाले. राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. राजीव सातव, खा. कुमार केतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.मोहन प्रकाश म्हणाले, इंग्रजांची गुलामी करणारे आज सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे महत्त्व वाटत नाही. काँग्रेसने स्वातंत्र्याची मूल्ये जोपासली. परंतु आज जातीमध्ये द्वेष पसरविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. आज इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाचा काळ नसून ‘माऊथ मीडिया’चा आहे. हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन शासनाच्या फसव्या योजनांबाबत नागरिकांशी सातत्याने चर्चा करावी.मोदी सरकारने संरक्षणमंत्र्यांना विश्वासात न घेता राफेल विमानांचा सौदा केला. या विमान खरेदीमध्ये ३६ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. तर कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. हा प्रकल्प सौदी अरेबियाला सोबत घेऊन केला जाणार आहे. आज सौदीमध्ये सर्व अभियंते पाकिस्तान येथील असून ते भारतात येणार नाहीत कशावरून, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट म्हणाले, लोकांना भावनिक बनवून आणि खोटी आश्वासने देऊन सत्तेत येता येते. परंतु सरकार चालविणे अवघड आहे. नरेंद्र मोदी यांनीदेखील लोकांना भावनिक करून सत्ता मिळविली. परंतु ते सरकार चालविण्यात अपयशी ठरले आहेत. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणाºया भाजपाचा २०१९च्या निवडणुकांमध्ये पराभव अटळ आहे, असे मत खा. कुमार केतकर यांनी व्यक्त केले.‘सर्व घोषणा कागदोपत्री’शासनाने सर्व घटकांच्या हातावर तुरी देण्याचे काम केले असून शेतकºयांना नुसतीच आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचे धोरण आखले जात आहे. एकीकडे शेतकरी बोंडअळी, कर्जमाफी, गारपीट, दुष्काळ यामुळे त्रस्त असताना शासनाने अनेक घोषणा केल्या; परंतु त्या कागदोपत्री असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेस