शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव

By admin | Updated: June 9, 2014 01:24 IST

नागपूरमधील काँग्रेसच्या पराभवाचे खापर कार्यकर्त्यांंंनी नेत्यांच्या डोक्यावर फोडले. आपसातील मतभेदामुळे नेत्यांनी जोमाने कार्य केले नाही. सच्चा कार्यकर्त्यांंंची कदर करण्यात आली नाही.

कार्यकर्त्यांंंचा आरोप : समीक्षा बैठकीत व्यक्त केला रोष नागपूर : नागपूरमधील काँग्रेसच्या पराभवाचे खापर कार्यकर्त्यांंंनी नेत्यांच्या डोक्यावर फोडले. आपसातील मतभेदामुळे नेत्यांनी जोमाने कार्य केले नाही.  सच्चा कार्यकर्त्यांंंची कदर करण्यात आली नाही. यामुळे काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले, असे मत नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या  समीक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आले. ही बैठक रविवारी राणीकोठी येथे पार पडली.बैठकीत माजी खासदार विलास मुत्तेमवार, रोहयो मंत्री नितीन राऊत, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री अनिस  अहमद, माजी खासदार गेव्हबाबू आवारी, आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार एस. क्यू. जमा, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी  शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, शेख हुसेन, माजी आमदार अशोक धवड, ज्येष्ठ नेते विनोद गुडधे-पाटील आदी नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांंंना सर्वप्रथम  बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांनी आपापल्या पद्धतीने पराभवाची समीक्षा करून विविध महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. कार्यकर्त्यांंंनी उपस्थित  केलेल्या भावना नेत्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडणार्‍या होत्या. नेत्यांनी शेवटी मनोगत व्यक्त केले.मुत्तेमवार यांनी व्यथित मनाने भावनांना वाट मोकळी करून दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची यापूर्वीही पिछेहाट झाली होती. परंतु, विदर्भातील  नागरिकांनी काँग्रेसचा हात सोडला नव्हता. यावेळी कुणी विरोधात काम केले किंवा कुणी कामच केले नसल्याने हरलो नाही. प्रतिस्पर्धी उमेदवार  ताकदवान होता. आरएसएस सारखी मोठी संघटना त्याच्या पाठीशी होती. आरएसएस कार्यकर्ते घरोघरी जाऊन परिवर्तन आणण्याचा प्रचार करीत  होते. त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. काँग्रेसने निवडणुकीचे तिकीट १५ दिवसांपूर्वी जाहीर केले. यामुळे प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.  प्रामाणिकपणे कार्य करणे हाच माझा दोष असून नागरिकांनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या उमेदवाराला निवडून दिले आहे, असे मुत्तेमवार यांनी  सांगितले.काँग्रेसने नागपूरचा विकास केला, पण नागरिकांनी या शहराला भकास करणार्‍यांना सत्तेवर बसविले. आपण पूर्ण क्षमतेने बाजू मांडू शकलो नाही.   ‘अपने दिलभी नही मिले और हातभी’, असे सूचक वक्तव्य नितीन राऊत यांनी केले.चतुर्वेदी यांनी घरभेद्यांना ओळखण्याचे व विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले, तर अहमद यांनी भूतकाळातील चुका  सुधारून पुढे जाण्यास सांगितले.(प्रतिनिधी)