शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव

By admin | Updated: June 9, 2014 01:24 IST

नागपूरमधील काँग्रेसच्या पराभवाचे खापर कार्यकर्त्यांंंनी नेत्यांच्या डोक्यावर फोडले. आपसातील मतभेदामुळे नेत्यांनी जोमाने कार्य केले नाही. सच्चा कार्यकर्त्यांंंची कदर करण्यात आली नाही.

कार्यकर्त्यांंंचा आरोप : समीक्षा बैठकीत व्यक्त केला रोष नागपूर : नागपूरमधील काँग्रेसच्या पराभवाचे खापर कार्यकर्त्यांंंनी नेत्यांच्या डोक्यावर फोडले. आपसातील मतभेदामुळे नेत्यांनी जोमाने कार्य केले नाही.  सच्चा कार्यकर्त्यांंंची कदर करण्यात आली नाही. यामुळे काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले, असे मत नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या  समीक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आले. ही बैठक रविवारी राणीकोठी येथे पार पडली.बैठकीत माजी खासदार विलास मुत्तेमवार, रोहयो मंत्री नितीन राऊत, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री अनिस  अहमद, माजी खासदार गेव्हबाबू आवारी, आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार एस. क्यू. जमा, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी  शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, शेख हुसेन, माजी आमदार अशोक धवड, ज्येष्ठ नेते विनोद गुडधे-पाटील आदी नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांंंना सर्वप्रथम  बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांनी आपापल्या पद्धतीने पराभवाची समीक्षा करून विविध महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. कार्यकर्त्यांंंनी उपस्थित  केलेल्या भावना नेत्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडणार्‍या होत्या. नेत्यांनी शेवटी मनोगत व्यक्त केले.मुत्तेमवार यांनी व्यथित मनाने भावनांना वाट मोकळी करून दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची यापूर्वीही पिछेहाट झाली होती. परंतु, विदर्भातील  नागरिकांनी काँग्रेसचा हात सोडला नव्हता. यावेळी कुणी विरोधात काम केले किंवा कुणी कामच केले नसल्याने हरलो नाही. प्रतिस्पर्धी उमेदवार  ताकदवान होता. आरएसएस सारखी मोठी संघटना त्याच्या पाठीशी होती. आरएसएस कार्यकर्ते घरोघरी जाऊन परिवर्तन आणण्याचा प्रचार करीत  होते. त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. काँग्रेसने निवडणुकीचे तिकीट १५ दिवसांपूर्वी जाहीर केले. यामुळे प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.  प्रामाणिकपणे कार्य करणे हाच माझा दोष असून नागरिकांनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या उमेदवाराला निवडून दिले आहे, असे मुत्तेमवार यांनी  सांगितले.काँग्रेसने नागपूरचा विकास केला, पण नागरिकांनी या शहराला भकास करणार्‍यांना सत्तेवर बसविले. आपण पूर्ण क्षमतेने बाजू मांडू शकलो नाही.   ‘अपने दिलभी नही मिले और हातभी’, असे सूचक वक्तव्य नितीन राऊत यांनी केले.चतुर्वेदी यांनी घरभेद्यांना ओळखण्याचे व विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले, तर अहमद यांनी भूतकाळातील चुका  सुधारून पुढे जाण्यास सांगितले.(प्रतिनिधी)