शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

“निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा”: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 19:07 IST

Congress Balasaheb Thorat: सरकारने तातडीने मदत केली नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.

Congress Balasaheb Thorat: मागील तीन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर, कापूस, कांदा सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर खरीप वाया गेले, बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी पिकं करपून गेली आहेत. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उरले सुरली पिकं आणि फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता पंचनामे, पाहणी निकष यात न पडता शेतक-यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.  

बाळासाहेब थोरात यांनी अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यातल्या बहुतांश भागात दुष्काळ आहे. अनेक ठिकाणी रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. या संकटामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत असताना आता झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. 

शेतकऱ्याला आधाराची आणि मदतीची गरज

नाशिक जिल्हाला या गारपिटीचा मोठा फटका बसला असून एकट्या नाशिक जिल्ह्यात ३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं आणि फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. मका, सोयाबीन, धान, कांदा, टोमॅटो, कांदा रोपवाटीका, ज्वारी, द्राक्षे यासह फळबागा गारपीटीने नष्ठ झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. बँकांकडून कर्ज घेऊन शेतक-यांनी या बागा जगवल्या होत्या. त्याला आधाराची आणि मदतीची गरज असून सरकारने पंचानामा, पाहणी, निकष याचे कागदी घोडे न नाचवता शेतक-यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत तात्काळ द्यावी, असे थोरात म्हणाले. 

दरम्यान, राज्यातील सरकारचा पूर्वीचा अनुभव चांगला नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री मोठमोठ्या घोषणा करतात पण प्रत्यक्षात शेतक-यांना मदत मिळत नाही. खरीपाच्या हंगामात झालेल्या नुकसानीची सरकारने अद्याप भरपाई दिलेली नाही. शेतक-यांना पीक विमा ही मिळालेला नाही. पीकविमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत आहेत पण शेतक-यांना मदत देत नाहीत. सरकारने विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप लावून शेतक-यांना विम्याची नुकसान भरपाई मिळवून द्यावी. सरकारने शेतक-यांना मदत करण्यास चालढकल केली तर हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरू असा इशारा थोरात यांनी दिला.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस