शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Rajya Sabha Elections 2022: “देशमुख, मलिकांचे मत मिळाले नाही, तरी महाविकास आघाडी विजयी होईल”: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:42 IST

Rajya Sabha Elections 2022: आमचे गणित आम्ही व्यवस्थित केले आहे आणि आम्ही ते अचूक सोडवणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

संगमनेर: राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Elections 2022) रणधुमाळी जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडीसह भाजप एक-एक मतासाठी मोठी मेहनत घेताना दिसत आहेत. भाजपसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष आता अपक्षांची मते मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीसह भाजपने आपले सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा केला आहे. यातच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मते मिळाली नाहीत, तरी महाविकास आघाडीचाच विजय होईल. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे, असा दावा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केले. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानाची परवानगी मिळावी, याबाबत विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांची मते मिळाली नाहीत, तरी महाविकास आघाडी चारही जागेवर विजयी होऊ शकेल, असे थोरात म्हणाले.

महाविकास आघाडीची चौथी जागा निवडून यायला काहीच अडचण नाही

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संजय पवार हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. महाविकास आघाडीची चौथी जागा निवडून यायला काहीच अडचण नाही. ही निवडणूक आमच्यासाठी अवघड नाही. कारण आमच्याकडे अपक्षांसह मित्र पक्षांचे संख्याबळ आहे. तसेच एमआयएम आणि सपाच्या भूमिकेवर बोलताना, जे जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ, आम्हाला अनेकजण मदत करणारे आहेत, असे थोरातांनी स्पष्ट केले. 

एकाही मताची चुक नको म्हणून काळजी घेतली जात आहे

महविकास आघाडीच्या आमदारांना हॉटेलात ठेवल्याबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. एकाही मताची चुक नको म्हणून काळजी घेतली जात आहे. कोणी गैरहजर राहीला तर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आमचे गणित आम्ही व्यवस्थित केले आहे आणि आम्ही ते यशस्वीपणे सोडवणार असल्याचे थोरात यांनी नमूद केले.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात