शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Rajya Sabha Elections 2022: “देशमुख, मलिकांचे मत मिळाले नाही, तरी महाविकास आघाडी विजयी होईल”: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:42 IST

Rajya Sabha Elections 2022: आमचे गणित आम्ही व्यवस्थित केले आहे आणि आम्ही ते अचूक सोडवणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

संगमनेर: राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Elections 2022) रणधुमाळी जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडीसह भाजप एक-एक मतासाठी मोठी मेहनत घेताना दिसत आहेत. भाजपसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष आता अपक्षांची मते मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीसह भाजपने आपले सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा केला आहे. यातच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मते मिळाली नाहीत, तरी महाविकास आघाडीचाच विजय होईल. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे, असा दावा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केले. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानाची परवानगी मिळावी, याबाबत विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांची मते मिळाली नाहीत, तरी महाविकास आघाडी चारही जागेवर विजयी होऊ शकेल, असे थोरात म्हणाले.

महाविकास आघाडीची चौथी जागा निवडून यायला काहीच अडचण नाही

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संजय पवार हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. महाविकास आघाडीची चौथी जागा निवडून यायला काहीच अडचण नाही. ही निवडणूक आमच्यासाठी अवघड नाही. कारण आमच्याकडे अपक्षांसह मित्र पक्षांचे संख्याबळ आहे. तसेच एमआयएम आणि सपाच्या भूमिकेवर बोलताना, जे जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ, आम्हाला अनेकजण मदत करणारे आहेत, असे थोरातांनी स्पष्ट केले. 

एकाही मताची चुक नको म्हणून काळजी घेतली जात आहे

महविकास आघाडीच्या आमदारांना हॉटेलात ठेवल्याबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. एकाही मताची चुक नको म्हणून काळजी घेतली जात आहे. कोणी गैरहजर राहीला तर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आमचे गणित आम्ही व्यवस्थित केले आहे आणि आम्ही ते यशस्वीपणे सोडवणार असल्याचे थोरात यांनी नमूद केले.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात