शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:19 IST

साताऱ्यात म्हणाले । चीनने १९६२ च्या युद्धानंतर ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : चीनच्या मुद्यावरून मोदी सरकारवर हल्ले होत असताना माजी संरक्षणमंत्री आणि काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्वत:ला यापासून दूर ठेवले आहे.

सातारा येथे बोलताना शरद पवार म्हणाले की, चीनने १९६२ च्या युद्धानंतर जवळपास ४५ हजार चौरस कि.मी. भारतीय भूभाग बळकावला आहे. दरम्यान, पीएमओने २० जून रोजी स्पष्ट केले होते की, गत ६० वर्षांत देशाने ४३ हजार चौरस कि.मी. भाग गमावला आहे. मात्र, मोदी सरकारच्या काळात एक इंचही जमीन गमावली नाही. शरद पवार हे जाहीरपणे काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वांना सांगत आहेत की, हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा आहे आणि याचे राजकारण करू नका. त्यांनी हे स्पष्ट केले की, चीनने आपला ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला आहे, हे कोणीही विसरू शकत नाही. शरद पवार यांचे असेही म्हणणे आहे की, गलवान खोऱ्यातील घटना ही संरक्षण मंत्रालयाचे अपयश आहे, अशा स्वरूपात लगेच पाहता येणार नाही. कारण, गस्तीवरील भारतीय सैनिक सतर्क होेते.चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी?चीनच्या मुद्यावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवण्याची शरद पवार यांची ही चौथी वेळ आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवले. सरकारने विरोधी पक्षांची समोरासमोर बैठक घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यावेळीही पवार यांनी वेगळी भूमिका घेतली होती. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनच्या मुद्यावर काँग्रेसच्या भूमिकेवर असहमती दर्शविली होती. चीनच्या मुद्यावर काँग्रेस काही प्रमाणात एकाकी पडल्याचे दिसत आहे. कारण, कोणताही प्रमुख विरोधी पक्ष त्यांना समर्थन करताना दिसत नाही. अगदी डावे पक्ष, डीएमके, जेएमएम, ममता बॅनर्जी, सपा, बसपा, टीडीपी, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बेजेडी हे पक्षही थेट बोलत नाहीत. कारण, सीमेवर युद्धासारखी परिस्थिती आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchinaचीनcongressकाँग्रेस