शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:19 IST

साताऱ्यात म्हणाले । चीनने १९६२ च्या युद्धानंतर ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : चीनच्या मुद्यावरून मोदी सरकारवर हल्ले होत असताना माजी संरक्षणमंत्री आणि काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्वत:ला यापासून दूर ठेवले आहे.

सातारा येथे बोलताना शरद पवार म्हणाले की, चीनने १९६२ च्या युद्धानंतर जवळपास ४५ हजार चौरस कि.मी. भारतीय भूभाग बळकावला आहे. दरम्यान, पीएमओने २० जून रोजी स्पष्ट केले होते की, गत ६० वर्षांत देशाने ४३ हजार चौरस कि.मी. भाग गमावला आहे. मात्र, मोदी सरकारच्या काळात एक इंचही जमीन गमावली नाही. शरद पवार हे जाहीरपणे काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वांना सांगत आहेत की, हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा आहे आणि याचे राजकारण करू नका. त्यांनी हे स्पष्ट केले की, चीनने आपला ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला आहे, हे कोणीही विसरू शकत नाही. शरद पवार यांचे असेही म्हणणे आहे की, गलवान खोऱ्यातील घटना ही संरक्षण मंत्रालयाचे अपयश आहे, अशा स्वरूपात लगेच पाहता येणार नाही. कारण, गस्तीवरील भारतीय सैनिक सतर्क होेते.चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी?चीनच्या मुद्यावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवण्याची शरद पवार यांची ही चौथी वेळ आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवले. सरकारने विरोधी पक्षांची समोरासमोर बैठक घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यावेळीही पवार यांनी वेगळी भूमिका घेतली होती. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनच्या मुद्यावर काँग्रेसच्या भूमिकेवर असहमती दर्शविली होती. चीनच्या मुद्यावर काँग्रेस काही प्रमाणात एकाकी पडल्याचे दिसत आहे. कारण, कोणताही प्रमुख विरोधी पक्ष त्यांना समर्थन करताना दिसत नाही. अगदी डावे पक्ष, डीएमके, जेएमएम, ममता बॅनर्जी, सपा, बसपा, टीडीपी, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बेजेडी हे पक्षही थेट बोलत नाहीत. कारण, सीमेवर युद्धासारखी परिस्थिती आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchinaचीनcongressकाँग्रेस