शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

नेत्यांच्या स्वहितामुळे काँग्रेस रसातळाला

By admin | Updated: July 10, 2017 01:26 IST

पुण्यामध्ये लोकसभा, विधानसभा, महापालिका अशा एका पाठोपाठ तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : स्वातंत्र्य चळवळीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये लोकसभा, विधानसभा, महापालिका अशा एका पाठोपाठ तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पक्षातील विविध गट-तट व नेते यांनी पक्षहितासाठी एकत्र येणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात त्याच्या उलट पक्षात गटबाजीला मोठ्याप्रमाणात उधाण आले आहे. नेत्यांनी स्वहितावर लक्ष केंद्रित केल्याने पक्ष रसातळाला गेला असल्याची खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नव्याने पक्षात येणाऱ्यांना ब्लॉक व जिल्हा पातळीवरची ५० टक्के पदे देऊन पक्षसंघटना वाढविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे; मात्र पक्ष खऱ्या अर्थाने वाढवायचा असेल, तर काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची अस्वस्थता दूर करण्याची सर्वांत पहिली आवश्यकता आहे.काँग्रेस पक्षाने अनेकांना मंत्रिपदे, खासदार, आमदारकी, महामंडळे, नगरसेवक व पक्षसंघटनेतील अनेक पदे देऊन मोठे केले. त्यांनी वर्षानुवर्षे सत्ता उपभोगली; मात्र आज पक्षसंघटनेचा अडचणीचा काळ असताना हेच लोक अचानक गायब झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेस पक्षात सध्या गटबाजीला उधाण आले आहे. महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा समावेश करण्याच्या विरोधात पक्षातील काही नेते व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी हा पक्षाचा कार्यक्रम नसल्याचे जाहीर केले. एचसीएमटीआर रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयुक्तांच्या गाडीला साखळदंडाने जखडण्याचे आंदोलन केले; मात्र या आंदोलनाला पालिकेतील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. पक्षातील मतभेद सातत्याने जाहीरपणे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पक्षात कुणीच कुणाचे ऐकत नसल्याची परिस्थिती आहे. स्वीकृत नगरसेवकपद मिळाले नाही, गट नेतेपदाची संधी मिळाली नाही; तसेच विशिष्ट हितसंबंध डोळ्यांसमोर ठेवून नेते कृती करू लागल्याने कार्यकर्ते सैरभैर झाली आहेत. पक्ष अडचणीत असताना आता नेत्यांनी किमान आता तरी स्वहित बाजूला ठेवावे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच अनेक नगरसेवकांनी पक्षाला रामराम करून भाजपाचा रस्ता धरला होता. त्या वेळी शहर पातळीवरील व महापालिकेतील पक्ष नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची होती; मात्र पक्षाकडून फारशा हालचाली न झाल्याने, आज पालिकेत काँग्रेस पक्ष ९ नगरसेवकांपुरता मर्यादित झाला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी देताना काही धाडसी निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र इथे भाकरी फिरवली गेली नाही, त्याची परिणीती विधानसभा निवडणुकीत आठही मतदारसंघांत पराभव होण्यात झाली. या दोन पराभवानंतर तरी धडा घेऊन काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीला सर्व ताकदीनिशी सामोरे जाणे अपेक्षित होते; मात्र पालिका निवडणुकीतही एकसंध काँग्रेस दिसलीच नाही.कार्यकर्त्यांपेक्षा वारसदारांवरच भिस्तकाँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून आपल्या वारसदारांची व्यवस्था लावण्याची स्पर्धा लागली आहे. त्याचे लोण शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये पसरत असल्याचे दिसून येत आहे. केवळ मोठ्या घराण्याचा वारसा आहे म्हणून खासदार, आमदारकीची उमेदवारी देण्याची परंपरा खंडित करून लढावू कार्यकर्त्याला निवडणुकीच्या रिंगणात उरतविले गेले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपा तळातील कार्यर्त्यांना उमेदवारी, संघटनात्मक जबाबदारी देऊन मोठे करीत आहे. त्यामुळे सर्व पक्षातून भाजपात जाण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. रस्त्यावरची लढाईही लढावीमहापालिकेमध्ये केवळ सभागृहात भाषणबाजी करून पक्ष मोठा होणार नाही. सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरची लढाईही पक्षाला लढावी लागणार आहे. महापालिकेतील नेतृत्वाने उत्कृष्ट वक्तृत्वाबरोबरच संघटन बांधणीकडे लक्ष द्यावे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी आपलेपणाने वागणे, परस्परांना आदर देणे आदी कौशल्येही त्यांनी आत्मसात करणे आवश्यक असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.>प्रदेश नेतृत्वाचे दुर्लक्ष : अहवाल पाठविण्याची यंत्रणा मोडीतशहर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गटबाजीला आलेले उधाण, पक्षाची दिवसेंदिवस वाईट होत असलेली अवस्था, याची कोणतीही दखल प्रदेश नेतृत्वाकडून अद्याप घेण्यात आलेली नाही. पूर्वी निरीक्षक, संपर्कप्रमुख, प्रदेश पातळीवरील पदाधिकारी शहरातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून त्याचा वेळोवेळी प्रदेशाध्यक्षांना अहवाल द्यायचे, मात्र काँग्रेस पक्षातील ही यंत्रणाच आता मोडीत निघाल्याचे चित्र दिसून येत आहे. विधान परिषद निवडणुकीत काँगे्रस पक्षाचे ५१ नगरसेवक फुटले त्याचीही गंभीर दखल पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आली नाही.