शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आदिवासी खात्यातील निविदेचा घोळ; रोख मदतीची समितीची शिफारस धुडकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 04:03 IST

खाद्यवस्तू पुरविण्याचे कंत्राट होते २३१ कोटी रुपयांचे. आता हे कंत्राट विशिष्ट कंत्राटदारांनाच मिळावे यासाठी झारीतील शुक्राचार्यांनी बरोबर रचना केली. त्यांना सोईच्या व इतरांना जाचक ठराव्यात अशा अटी टाकण्यात आल्या.  

-  यदु जोशीमुंबई : राज्यातील साडेबारा लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या खाद्यवस्तू पुरविण्याच्या निविदेतील अटी-शर्ती जाचक असल्याने त्या आता बदलायच्या म्हटले तरी ३१ मार्च २०२१ पूर्वी वस्तू पुरविता येणार नाहीत. म्हणून खाद्यवस्तू पुरवठ्याची निविदा रद्द करून चार हजार रुपये रोखीने द्यावेत किंवा निदान दोन हजार रुपये तरी रोखीने द्यावेत, ही अतिरिक्त मुख्य सचिवांच्या (वित्त) अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने केलेली शिफारस धुडकावून विभागाने निविदा प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. खाद्यवस्तू पुरविण्याचे कंत्राट होते २३१ कोटी रुपयांचे. आता हे कंत्राट विशिष्ट कंत्राटदारांनाच मिळावे यासाठी झारीतील शुक्राचार्यांनी बरोबर रचना केली. त्यांना सोईच्या व इतरांना जाचक ठराव्यात अशा अटी टाकण्यात आल्या.  १६ पैकी १२ निविदाधारकांनी त्याविषयी लेखी तक्रारी विभागाकडे केल्या आणि अटी शिथिल करण्याची मागणी केली. या खाद्यवस्तू पुरविण्यास काढावयाच्या निविदांच्या अटी-शर्ती निश्चित करण्याचे अधिकार अतिरिक्त मुख्य सचिवांच्या (वित्त) अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले होते. समितीने त्या निश्चित केल्या. मात्र त्यामध्ये बदल करून परत निविदा काढली तर चालू आर्थिक वर्ष संपण्याआधी म्हणजे ३१ मार्च २०२१ पूर्वी खाद्यवस्तू पुरविणे शक्य होणार नाही, असा अहवाल दिला आहे. वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीच्या अहवालावर आता आदिवासी विकास विभाग काय निर्णय घेतो, याबाबत उत्सुकता आहे. निविदा प्रक्रिया रद्द करून रोख रक्कम आदिवासींना देणार का, याची विचारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच टेक्स्ट मेसेजलाही प्रतिसाद दिला नाही. आदिवासींना ना रोख मिळाली ना खाद्यवस्तू कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये हजारो आदिवासी गावी परतले. रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. साडेबारा लाख आदिवासी कुटुंबांना खावटीच्या स्वरूपात दोन हजार रुपये रोख आणि दोन हजार रुपयांच्या खाद्यवस्तू देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने ऑगस्टमध्ये घेतला होता. n ९ सप्टेंबरला जीआरदेखील निघाला, पण आतापर्यंत निविदांचा केवळ घोळ सुरू आहे. एकूण चार हजार रुपये डीबीटीच्या स्वरूपात दिले असते तर ते केव्हाच आदिवासींच्या बँक खात्यात जमा झाले असते. पण, आज तब्बल चार महिन्यांनंतर ना त्यांना रोख मिळाली ना खाद्यवस्तू.