शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वतंत्र विदर्भावरून गोंधळ

By admin | Updated: July 30, 2016 05:54 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याचा अशासकीय ठराव भाजपाचे खा. नाना पटोले लोकसभेत मांडणार असल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी

- अतुल कुलकर्णी, मुंबई

स्वतंत्र विदर्भ राज्याचा अशासकीय ठराव भाजपाचे खा. नाना पटोले लोकसभेत मांडणार असल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या नावे घोषणाबाजी केली तर परिवहन मंत्री दिवाकर रावते व भाजपाच्या विदर्भातील आमदारांमध्ये खडाजंगी झाली. गदारोळात दोन्ही सभागृहांचे काम बंद पडले.लोकसभेच्या कामकाज पत्रिकेवर आज खा. पटोल यांचा स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव होता. मात्र, इतर प्रश्नावरून गदारोळ झाल्याने हा प्रस्ताव लोकसभेच्या पटलावर मांडला गेलाच नाही. त्याआधीच या न मांडलेल्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. शिवसेनेचे नेते आक्रमक झाल्याने भाजपा सदस्यांशी चांगलीच खडाजंगी झाली. भाजपा-सेना आपापसात भिडल्याचे पाहून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, आ. जयंत पाटील यांनी विरोधकांना शांत बसण्यास सांगून दोघांमधील बेबनाव जाणीवपूर्वक स्पष्टपणे समोर येऊ दिला. सभागृह संपल्यावरही भाजपाचा एक गट स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, अशा घोषणा देत तर शिवसेनेचा गट अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत पायऱ्यांवर उतरला. या विषयावरून सेनेचा वाघ खरोखरीचा आहे की पेंढा भरलेला हे सोमवारी कळेलच, असा चिमटा काढत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची हीच ती वेळ असल्याचे सांगितले. स्वतंत्र विदर्भाचा एवढा ताठ बाणा असेलच तर विदर्भातील भाजपा आमदारांनी तत्काळ राजीनामे द्यावेत, असे आवाहन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. विधानसभेतही स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा गाजला. महाराष्ट्र तोडण्याची भाजपाची भाषा खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत विखे-पाटील यांनी स्वतंत्र विदर्भाच्या ठरावाला विरोध केला. अजित पवार यांनी यावर सेनेची भूमिका काय, असे डिवचले. त्यावर सेनेचे आ. सुनील प्रभू यांनी स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात भूमिका मांडताच भाजपाचे विदर्भवादी आमदार वेलमध्ये आले. गदारोळातच सभागृह तहकूब झाले.स्वतंत्र विदर्भाबाबत सरकारचे मत काय?लोकसभेत असा ठराव आल्याची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. पण लोकसभेतील कामकाजाचा मुद्दा विधान परिषदेत मांडता येतो का? असा मुद्दा विधान परिषदेत संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी उपस्थित केला. त्यावर आम्हाला सरकारचे स्वतंत्र्य विदर्भाबाबतचे मत हवे आहे असे म्हणत विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. त्यातच शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांच्या बाजूने आपले मत मांडले. त्यामुळे झालेल्या गदारोळात दोनवेळा सभागृह तहकूब झाले व शेवटी सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिवसभरासाठी सभागृह तहकूब केले.स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे आमदार, खासदार यांनी आधी राजीनामे देऊन विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकून दाखवावी. ते बहुसंख्येने निवडून आले तर लोकभावना विदर्भ राज्याच्या बाजूने आहे हे दिसेल. विदर्भातील जनतेने त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठविले आहे. अशावेळी त्यांच्या भावनेचा अनादर करणे भाजपाला शोभत नाही. राज्याची शकले करण्याचा डाव आम्ही सहन करणार नाही. - जयंत पाटील, राष्ट्रवादीचे गटनेतेस्वतंत्र विदर्भाचा लोकसभेत ठराव मांडणे हा राज्याच्या अस्मितेला धक्का लावण्याचा भाजपाचा डाव आहे. १०५ जणांच्या हौतात्म्याचा हा अवमान आहे. राज्याच्या अखंडत्वाबद्दल राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी आता सभागृहात मांडलीच पाहिजे.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा