शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील कामगारांची अवस्था दयनीय; मूळगावी परतण्यासाठी त्यांना पूर्ण सुविधा द्या : मेधा पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:40 IST

सर्व स्थलांतरित कामगारांचे प्रश्न सोडवावेत.

ठळक मुद्देभोसरी, चिंचवड येथील कष्टकऱ्यांच्या समजून घेतल्या अडचणीरेशन दुकानास भेट देऊन त्यांच्याकडे आलेला साठा व वितरण याबाबत घेतली माहिती

पिंपरी : देशभरातल्या कष्टकरी कामगारांची अवस्था दयनीय असून त्यांना लॉकडाउन काळातील वेतन मिळाले पाहिजे त्यांना इच्छित स्थळी जाण्याची सुविधा केली पाहिजे. निघाल्यापासून ते पोहचेपर्यंत मोफत प्रवास व त्यांना अन्न, पाण्याची सुविधा मिळावी. वैद्यकीय तपासण्या मोफत कराव्यात. सर्व स्थलांतरित कामगारांचे  प्रश्न सोडवावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जन आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी भोसरी येथे केले. मेधा पाटकर यांनी रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, चिंचवडसह इतर ठिकाणी परप्रांतीय कामगार वस्ती, कंपनी कामगार अशा कामगारांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते तसेच गिरीश वाघमारे, इब्राहिम खान, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, वंदना थोरात, सचिन नागणे,  राजेश माने सुनीता पोतदार, शब्बीर शेख आदी या वेळी उपस्थित होते.राज्यासह परराज्यातील कामगारांनीही आपल्या समस्या मेधा पाटकर यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी त्याची नोंद करत त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासित केले. रेशन दुकानास भेट देऊन त्यांच्याकडे आलेला साठा व वितरण याबाबत माहिती घेतली. तसेच रेशन दुकानदारांना काही सूचना केल्या. 

मेधा पाटकर म्हणाल्या, कामगारांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळाले पाहिजे. सध्याच्या स्थितीमध्ये रेशनिंगच्या बाबतीतल्या अडचणी दूर करून तीन महिन्यापर्यंत मोफत रेशन देण्याची सुविधा करणे गरजेचे आहे. विविध राज्यातील कामगारांना गावी जाण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळ , रेल्वे प्रशासन यांनी ही टाळाटाळ न करता  त्यांना सहकार्य करावे आणि त्यांना इच्छित स्थळी जाण्याची सोय करून द्यावी. अनेक ठिकाणी कामगारांची आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी होत आहे, परंतु त्यांना सुविधा मिळत नाहीत. विविध ठिकाणच्या कामगारांना लॉकडाऊनच्या पूवीर्पासूनचे आणि लॉकडाऊन काळातील त्यांचे वेतन मिळणे बाकी आहे. त्यांना सामाजिक जबाबदारी म्हणून वेतन मिळाले नाही. याची जबाबदारी मालक व व्यवस्थापनाने घ्यावी. कम्युनिटी किचन प्रशासनाकडून बंद केल्यामुळे अनेक लोकांचे हाल होत अहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महिनाभर त्यांना जेवणाची सुविधा चालू ठेवावी.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMigrationस्थलांतरणLabourकामगारGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या