शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

देशभरातील कामगारांची अवस्था दयनीय; मूळगावी परतण्यासाठी त्यांना पूर्ण सुविधा द्या : मेधा पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:40 IST

सर्व स्थलांतरित कामगारांचे प्रश्न सोडवावेत.

ठळक मुद्देभोसरी, चिंचवड येथील कष्टकऱ्यांच्या समजून घेतल्या अडचणीरेशन दुकानास भेट देऊन त्यांच्याकडे आलेला साठा व वितरण याबाबत घेतली माहिती

पिंपरी : देशभरातल्या कष्टकरी कामगारांची अवस्था दयनीय असून त्यांना लॉकडाउन काळातील वेतन मिळाले पाहिजे त्यांना इच्छित स्थळी जाण्याची सुविधा केली पाहिजे. निघाल्यापासून ते पोहचेपर्यंत मोफत प्रवास व त्यांना अन्न, पाण्याची सुविधा मिळावी. वैद्यकीय तपासण्या मोफत कराव्यात. सर्व स्थलांतरित कामगारांचे  प्रश्न सोडवावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जन आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी भोसरी येथे केले. मेधा पाटकर यांनी रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, चिंचवडसह इतर ठिकाणी परप्रांतीय कामगार वस्ती, कंपनी कामगार अशा कामगारांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते तसेच गिरीश वाघमारे, इब्राहिम खान, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, वंदना थोरात, सचिन नागणे,  राजेश माने सुनीता पोतदार, शब्बीर शेख आदी या वेळी उपस्थित होते.राज्यासह परराज्यातील कामगारांनीही आपल्या समस्या मेधा पाटकर यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी त्याची नोंद करत त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासित केले. रेशन दुकानास भेट देऊन त्यांच्याकडे आलेला साठा व वितरण याबाबत माहिती घेतली. तसेच रेशन दुकानदारांना काही सूचना केल्या. 

मेधा पाटकर म्हणाल्या, कामगारांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळाले पाहिजे. सध्याच्या स्थितीमध्ये रेशनिंगच्या बाबतीतल्या अडचणी दूर करून तीन महिन्यापर्यंत मोफत रेशन देण्याची सुविधा करणे गरजेचे आहे. विविध राज्यातील कामगारांना गावी जाण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळ , रेल्वे प्रशासन यांनी ही टाळाटाळ न करता  त्यांना सहकार्य करावे आणि त्यांना इच्छित स्थळी जाण्याची सोय करून द्यावी. अनेक ठिकाणी कामगारांची आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी होत आहे, परंतु त्यांना सुविधा मिळत नाहीत. विविध ठिकाणच्या कामगारांना लॉकडाऊनच्या पूवीर्पासूनचे आणि लॉकडाऊन काळातील त्यांचे वेतन मिळणे बाकी आहे. त्यांना सामाजिक जबाबदारी म्हणून वेतन मिळाले नाही. याची जबाबदारी मालक व व्यवस्थापनाने घ्यावी. कम्युनिटी किचन प्रशासनाकडून बंद केल्यामुळे अनेक लोकांचे हाल होत अहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महिनाभर त्यांना जेवणाची सुविधा चालू ठेवावी.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMigrationस्थलांतरणLabourकामगारGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या