शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मंत्रालयात ‘काँक्रीट घोटाळा’!, कामाविनाच निघाली देयके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:29 IST

मंत्रालयातील उंदीर घोटाळा गाजत असतानाच आणखी एक ‘काँक्रीट घोटाळा’ समोर आला आहे

गणेश देशमुख  मुंबई : मंत्रालयातील उंदीर घोटाळा गाजत असतानाच आणखी एक ‘काँक्रीट घोटाळा’ समोर आला आहे. काम न करताच काँक्रीटीकरणाची बिले उचलण्यात आली असून यासंदर्भात तक्रार दाखल होताच बांधकाम विभागाने चौकशी सुरू केली आहे.मंत्रालयाच्या आवारातील काँक्रीटीकरण करण्यासाठी २४ लक्ष रुपये खर्च करण्याचे ठरले. प्रत्येकी तीन लक्ष रुपये याप्रमाणे आठ कार्यादेश काढण्यात आलेत. गजानन महाराज मजूर सहकारी संस्था, साई अभिषेक सह. मजूर संस्था., नीलम सह. मजूर संस्था आणि जितेश मजूर संस्था या कंपन्यांना प्रत्येकी तीन लक्ष रुपये आणि मे. प्रवीण कन्स्ट्रक्शन्स या कंपनीला तीन-तीन लक्ष रुपयांची चार, अशी एकूण १२ लक्ष रुपयांची कामे देण्यात आली. २०१५ सालच्या आॅगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यांत निघालेल्या या कार्यादेशांनुसार मंत्रालयाच्या आवारात फाउंडेशन आणि बेडिंगचे काम करावयाचे होते. या कामाचे नाव ‘प्रोव्हायडिंग अ‍ॅण्ड लेर्इंग इन सिटू सिमेंट काँक्रीट एम १५ आॅफ ट्रॅप मेटल फॉर फाउंडेशन अ‍ॅण्ड बेडिंग इन्क्ल्युडिंग मेलिंग आऊट वॉटर मॅन्युअली फॉर वर्क काम्पॅक्टिंग अ‍ॅण्ड क्यंरिंग’ असे आहे. परंतु हे काम केलेच गेले नाही. या कामाची सर्व देयके २७ मार्च २०१७ रोजी लेखाशीर्ष २०५९ अंतर्गत अदा करण्यात आली. या न झालेल्या कामाची देयके काढण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी शक्कल लढविली. १५ आॅगस्ट व २६ जानेवारी रोजी देशभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मंत्रालयात येतात. त्यासाठी म्हणून ही कामे महत्त्वाची आहेत, असा उल्लेख अंदाजपत्रकात सर्वसाधारण माहिती भरताना करण्यात आलेला आहे.८०० ट्रक : या कामासाठी ८०० ट्रक काळ्या दगडाचे ‘सोलिंग’ केल्याचे दाखविण्यात आले. दिवसाला ४० ट्रक असे महिनाभराच्या कालावधीत ही दगडे मंत्रालयाच्या आवारात आणली असेही दाखविले गेले. वास्तविक काँक्रीटीकरणासाठी काळ्या दगडांच्या ‘सोलिंग’ची गरज नसते.तरीही पुन्हा काँक्रीटीकरण : मंत्रालयाच्या इमारतीला आग लागल्यानंतर पुनर्निर्मितीच्या इतर कामांसोबत दोन कोटी ३४ लक्ष रुपयांचे काँक्रीटीकरणही केले गेले होते. त्या काक्रीटीकरणाचे आयुष्य २० वर्षे असून सन २०३४पर्यंत पुन्हा काँक्रीटीकरण करण्याची गरज नसल्याचेही तत्कालीन कंपनीने स्पष्ट केले होते. तरीही नवे काम दाखविण्यात आले.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय